रसायनयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: January 11, 2015 22:44 IST2015-01-11T22:44:45+5:302015-01-11T22:44:45+5:30
औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे.

रसायनयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : नाल्याशेजारीच रसायनयुक्त पाण्याचा हौद, पाण्याचा निचरा नाल्यात
तुमसर : औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे. त्याला निष्प्रभ करण्याकरिता कारंजे लावले आहेत. या पाण्याचा निचरा लागून असलेल्या नाल्यात होतो. या पाण्यामुळे मानवासहीत पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तुमसर गोंदिया राज्य महामार्गाशेजारी देव्हाडी (तुमसर रोड) शिवारात क्लेरियन ड्रग नावाची औषधी भुकटी तयार करणारी कंपनी मागील २० वर्षापूर्वी सुरु झाली होती. कंपनीच्या आवाराशेजारी या कंपनीने रसायनयुक्त पाणी (सल्फ्युरिक आम्ल) निष्प्रभ करण्याकरिता मोठा हौद तयार केला आहे.
हा हौद काळ्या प्लॉस्टीक आवरणाचा आहे. या हौदाला लागूनच नाला वाहतो. या नाल्यात रसायनयुक्त पाण्याचा निचरा सातत्याने होतो.
नाल्यात पाणी असल्याने येथे पाळीव जनावरे पाणी पिण्याकरिता नेहमी येतात.
परिसरात शेती आहे. अनेक शेतकरी या नाल्यातील पाणी सिंचनाकरीता वापरतात. परिणामी या रसायनयुक्त पाण्याचा पशुसोबतच मानवी आरोग्यला धोका निर्माण झाला आहे.
रसायनयुक्त पाण्याचा हौदाला आवारभिंत अथवा सुरक्षा कठडे कारखाना प्रशासनाने लावलेले नाहीत.
काटेरी कुंपणाचे लोखंडी खांब येथे तेवढे शिल्लक आहेत. काटेरी कुंपण काही वर्षाने तुटले त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने पुन्हा तयार केले नाही. या रसानयुक्त पाण्याच्या संपर्कात आल्यावर अथवा या महामार्गाने प्रवास केला तेव्हा उग्र वास येतो. वायूगळती तर झाली नाही ना असा भास येथे होतो. औषध भुकटी अथवा औषध तयार करणाऱ्या कारखान्याला पर्यावरण, वायू प्रदूषण तथा जलप्रदूषण मंडळाची रितसर परवानगी घ्यावी लागते. या मंडळाचे येथे नेहमी पथक येतात. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊन जातात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोणातून रसायनयुक्त पाण्याच्या हौदाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. उग्र वास का? व किती येते? हा येथे संशोधनाचा विषय आहे.
नाकाला तीव्र झिंग येथे येते हे विशेष. ग्रामपंचायत देव्हाडीचे सुद्धा येथे दुर्लक्ष दिसून येते. कोट्यवधी रूपयांचा नफा कमविणाऱ्या कारखाना प्रशासनाने नागरिकांच्या तथा पशुंच्या आरोग्याचे रक्षण करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)