शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धुळ कणांमुळे आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:12 PM

देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.देव्हाडी येथे मुंबई- हावडा रेल्वे फाटकावर उडाणपूलाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. फाटकाच्या दोन्ही बाजूला ‘अप्रोच’ उडाणपूलाचे कामात अदानी वीज कारखान्यातील राखेचा भराव करण्यात आला. पावसाळ्यात उडाणपूलातून पाण्यासह राख पर्यायी रस्त्यावर जमा होत आहे. पाऊस थांबल्यानंतर ही राख रस्त्यावर पडून ती वाळते. त्यानंतर वाहनाच्या रहादारीमुळे ती उडते. वाहने गेल्यावर वातावरणात राखेचा पांढरा थर सर्वत्र दिसतो. समोरची वाहने दिसत नाही.राख श्वास घेतानी नाकात गेल्यावर खोकला येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. डोळ्यात गेल्यावर मोठी जळजळ होते. लहान मुले, वृध्दांना मोठा त्रास होतो. पर्यायी रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. या मार्गाने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची वर्दळ आहे, परंतु सर्वच निमूटपणे येथून जात आहेत. वीज कारखान्यातील राख मानवी शरीरास घातक असल्याचे समजते. उडाणपूलाच्या बांधकामाकडे जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.उडाणपूलाच्या भरावात मुरुमाचा वापर करण्यात आलानाही येथे रासायनिक राखेचा वापर करण्यात आला. उडाणपूलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगडातून लिकेजमुळे पाणी बाहेर निघत आहे. बांधकामात सदोष स्थिती आहे काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. किमान दगडाजवळ मुरुमाचा थर देण्याची येथे गरज होती. १७ ते २० कोटींचे हे बांधकाम आहे. मुरुम उपलब्ध हो तनाही, म्हणून अदानी वीज कारखान्यातील राखेचा उपयोग भरावात करण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हा उडाणपूल तयार होत आहे. उडाणपूलावर नागपूर येथील बांधकाम खात्याचे नियंत्रणात कामे सुरु आहेत.परिसरातील नागरिकांना त्रास, डोळ्याचे आजार बळावले आहे. प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. अनेक तक्रारी केली, पंरतु कारवाई मात्र शुन्य आहे.अदानीची राख रासायनिक आहे. या राखेमुळे मानवी जिवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पूलात राखेचा भराव करण्याची मंजूरी होती काय? याची चौकशी करण्याची गरज आहे. सतत राखेचा तवंग परिसरात राहणे धोकादायक आहे.- डॉ. पंकज कारेमोरेयुवा काँग्रेस नेते तुमसर