शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मुख्याध्यापक-शिक्षकांची विद्यार्थी शोधमोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:20 IST

इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेत व्यस्त झालेले आहेत.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानात गुंतवू नका : नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेत व्यस्त झालेले आहेत. अशावेळी केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानाचे निर्मितीसाठी एसडीएमआयएस या प्रणालीत आॅनलाईन माहिती भरण्याचे काम मुख्याध्यापक शिक्षकांना देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांचा निकाल व विद्यार्थी शोध मोहिम यात अडथळा येवू नये, यासाठी समग्र शिक्षा अभियानात त्यांना गुंतविण्यात येवू नये, अशी शिक्षणक्षेत्रात बोलले जात आहे.प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग असलेल्या शाळांना शासनाचे प्रयोगाचे केंद्र बनविले आहे. शासन बदलले की प्रयोगही बदलत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासापेक्षा त्यांची व त्यांचे कुटुंबियांची माहिती शाळामार्फत संकलीत करण्यासाठी वर्ष कमी पडत आहे. सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत योग्य पद्धतीने काम सुरू असताना नवीन प्रयोग समग्र शिक्षा अभियान राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहे. पाणी तेच बाटली तेवढी बदलने या उक्तीप्रमाणे ही प्रयोग असणार आहे. प्रयोग करण्यासाठी ही योग्य वेळ नाही, अशी चर्चा समग्र शिक्षण क्षेत्रात होत आहे. समग्र शिक्षा अभियानासाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांची बरीचशी माहिती सरलच्या स्टुडेंट पोर्टलवर उपलब्ध आहे. शिक्षण विभागाने तीच माहिती केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियान योजनेसाठी परस्पर हस्तांतर का करू नये, असा प्रश्न विचारला जात आहे.इंग्रजी शाळांचा 'भूत' मराठी माध्यमाच्या शाळांच्या मानगुटीवर बसलेला असल्याने मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वत:ची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचत आहे. त्यांना पुस्तके, नोटबुक, दप्तर, सायकल व प्रसंगी रोख रक्कम याचे आमिष देवून शाळेसाठी विद्यार्थी मिळविण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करीत आहेत. एवढे करूनही कित्त्येक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेमधून अतिरिक्त ठरविले जात आहे. सत्र संपायला आले तरीही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात शिक्षण विभागाला यश आलेले नाही. सन २०१७-१८ ची संचमान्यता शाळांना प्राप्त झालेली नाही. समायोजन न झालेल्या कित्त्येक शिक्षकांना तीन चार महिने वेतनाशिवाय काम करावे लागत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा व त्यात काम करणारे कर्मचारी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. नोकर भरतीला परवानगी नाही. त्यामुळे शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अनेक पद रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शाळांची संचमान्यता वेळेवर व्हावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे समायोजन ठराविक वेळात पूर्ण करण्यात यावे, आवश्यकतेनुसार नोकर भरती करण्यात यावी व गरजेपेक्षा जास्त व अवेळी आॅनलाईन माहिती सादर करण्याची सक्ती करण्यात येवू नये, असा सूर आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी