‘तो’ वृद्ध शासनाच्या आधाराला मुकला

By Admin | Updated: January 11, 2015 22:45 IST2015-01-11T22:45:07+5:302015-01-11T22:45:07+5:30

एक नव्हे चारदा त्या वृध्दाने शासकीय आधारासाठी अर्ज केला. पण, प्रशासनातील स्वार्थी व्यक्तींमुळे ते अर्ज समितीपर्यंत पोहचलेच नाही. आज एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण निस्तारले.

'He' on the basis of old governance | ‘तो’ वृद्ध शासनाच्या आधाराला मुकला

‘तो’ वृद्ध शासनाच्या आधाराला मुकला

राजू बांते - मोहाडी
एक नव्हे चारदा त्या वृध्दाने शासकीय आधारासाठी अर्ज केला. पण, प्रशासनातील स्वार्थी व्यक्तींमुळे ते अर्ज समितीपर्यंत पोहचलेच नाही. आज एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण निस्तारले. मात्र तो पर्यंत या वृद्धाने जगाचा निरोप घेतला.
ही कथा नसून एका निराधार वृद्धाची व्यथा आहे. प्रशासन वृध्दांना कसे अव्हेरते. त्याचा नमुना मोहगाव देवी येथे दिसून आला. मोहगाव देवी येथे वास्तव्यास असलेला तो ८५ वर्षीय वृध्द. त्यांचे नाव ढोमणू पडोळे या वृध्दाने श्रावण बाळ योजनेसाठी चारदा अर्ज केले होते. ते अर्ज सगळे तत्कालीन तहसीलदार विजय बोरुडे यांच्या काळात दिले गेले होते. यात संजय गांधी निराधार योजनेतील काही सदस्य, प्रशासनातील कर्मचारी व काही बाहेरचे एजंटांचा समावेश होता. त्यामुळे ७७ वर्षीय ढोमणू गणपत पडोळे या वृध्दाचा आधारासाठी थारा लागला नाही. दरम्यान एका सामाजिक कार्यकत्याची त्या वृध्दाची २०१४ ला भेट झाली. त्या वृध्दाचा अर्ज भरला. सरळ संजय गांधी निराधार योजनाच्या बैठकित तहसिलदारांसमोर मांडला. अखेर तो अर्ज मंजूर झाला. २७ जून २०१४ ला ६०० रुपये प्रथम प्राप्त झाले. त्याच्या पुढच्या २ जुलै २०१४ ला अतिवृष्टीचे पैसे जमा झाले. नंतर पुन्हा २७ जुलैला संजय गांधी निराधार योजनेचे १२०० रुपये जमा झाले. ढोमणू पडोळे हे त्या आधाराची प्रतिक्षा करीत खाटेवर खिळून पडले. आधाराची पेंन्शन व अतिवृष्टीची सहायता निधीची स्वत: उचल करु शकला नाही. १२ वर्षापूर्वीपासून संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थीला प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या निराधार योजनेपासून वंचित राहावे लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर म्हणजे ७६ वर्षी या योजनेचा लाभ मिळाला. पण त्याच्या हक्काची शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शन प्राप्त करुन घेण्यासाठी वृध्द झालेला ढोमणू पडोळे हे सक्षम नव्हते. अखेर आज सकाळी ९ वाजता त्या वृध्दाने अखेरचा निरोप घेतला. प्रशासनाचे कर्मचारी गावा- गावात असताना अशा अनेक वृध्दांना शासनाकडून मिळणाऱ्या निराधार योजनेच्या निधीसाठी तहसिलमध्ये पायपीट करावी लागते. बऱ्याच वृध्दांना या योजनेपासून दूर राहावे लागते.
आज घडीला तत्कालीन तहसलिदारांनी मंजूर केलेले प्रकरणाची पून्हा तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी तपासणी सुरु केले आहे. दोन वर्षाचे प्रकरण अंतिम मंजूरीसाठी पडून आहेत. अशा वृध्दाची वाताहत होताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला दिसत नाही.

Web Title: 'He' on the basis of old governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.