शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या मानधनावर राबतात हातपंप कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

महाराष्ट्रात मागील ३५ वर्षापूर्वी विंधन विहिर खोदून त्यावर हातपंप बसविण्याची योजना विस्तृत प्रमाणात आजही सुरु आहे. विंधन विहिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. तथापि, त्या विहिरीचा पाणी अहोरात्र बाहेर यावा यासाठी राबणारा कामगार आजही वेठबिगार कामगार म्हणून तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहे. ग्रामविकास विभागाच्या ११ सप्टेंबर १९८१ च्या पत्रानुसार १०० हातपंपासाठी एक हातपंप दुरुस्तीस कामगार नेमण्यात आले होते.

ठळक मुद्देआर्थिक स्थितीही बेताची : मोहाडी तालुक्यात आठशेपेक्षा अधिक हातपंप

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे हातपंप दुरुस्त करणारा यांत्रिकी कामगार कायम होईल, या आशेवर जगत आहे. काही कामगारांना या प्रतीक्षेत मरण आले. परंतु जिल्हा परिषदेच्या असंवेदनशील व निर्दयी प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी त्यांना अजूनही ताटकळत ठेवले आहे.महाराष्ट्रात मागील ३५ वर्षापूर्वी विंधन विहिर खोदून त्यावर हातपंप बसविण्याची योजना विस्तृत प्रमाणात आजही सुरु आहे. विंधन विहिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. तथापि, त्या विहिरीचा पाणी अहोरात्र बाहेर यावा यासाठी राबणारा कामगार आजही वेठबिगार कामगार म्हणून तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहे. ग्रामविकास विभागाच्या ११ सप्टेंबर १९८१ च्या पत्रानुसार १०० हातपंपासाठी एक हातपंप दुरुस्तीस कामगार नेमण्यात आले होते. या कामगारांनी १८ रुपये ९० पैसे पासून काम करणे सुरु केले होते. आता प्रती हातपंप देखभाल दुरुस्तीसाठी १२० रुपये दिले जात आहेत. या कामगारांना केवळ एक रुपये एका दिवसासाठी सायकल भत्ता दिला जात होता.हातपंप दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध करून दिले जायचे. मात्र १९९५ नंतर एक रुपयाचा सायकल भत्ता बंद करण्यात आला. ‘टूल बॉक्स’ देणेही बंद करण्यात आले. आता हे हातपंप कामगार स्वत: च्या साधनाने गावात जातात. स्वत:च रुपये खर्च करून हातपंप दुरुस्तीचे साहित्य घेत असतात. महिन्याला दहा हजार रुपये यावेत यासाठी ग्रामीण भागातील शंभर हातपंपाची देखभाल करायला कामगार धावपळ करित जात असतो.मोहाडी तालुक्यात हातपंपाची संख्या आठशेच्या वर आहे. मोहाडी तालुक्यासाठी आता कामगार केवळ आठच आहेत. जिल्ह्यात आतास्थितीत ४० कामगार आहेत. दहा कामगारांचा मृत्यू झाला. या अस्थायी कामगारांना वय, शिक्षण आदी अटी शिथिल करून सेवेत सामावून घ्यावे असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे तत्कालीन अवर सचिव मोहन पांढरकामे यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ डिसेंबर १९९७ ला निर्देश दिले होते. त्यापूर्वी १ डिसेंबर १९९५ ला जलसंधारण विभागाचे उपसचिव सूर्यवंशी यानी रोजंदारी कार्यरत असलेल्या कामगारांना समांतरीत नियमीत आस्थापनेवर आणण्यात यावे सर्व जिल्हा परिषदच्या सीईओ यांना निर्देशित केले होते.पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयातील तत्कालीन अवर सचिव श.वी. दुवे यांनी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यातिल हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगारांना जिल्हा परिषदेकडून शासकीय सेवेत सामावून घेतले नाही, असे जानेवारी २०१३ ला पुणेच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पत्राचा संदर्भ देवून संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे व उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर यांनी अहवाल मागितला होता .या आधी भंडारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्या ५० कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, आजपर्यंत त्या कामगारांना शासकीय सेवेत कोणत्याही कामगारांना सामावून घेतले गेले नाही. या पैकी दहा जण आतातरी स्थैर्य लाभेल, आपले कुटुंब सुखी होईल या आशेवर मृत्यू पर्यंत प्रतीक्षाच करित राहिले. आता जिल्ह्यातील ४० कामगार निवृत्तीच्या उंबरठ्यावर आली आहेत तरी संवेदनहीन झालेल्या जिल्हा परिषदेला पाझर फूटलेला नाही. आजही हे कर्मचारी स्थायी होवू या आशेवर जीवनाचा गाडा ढकलत आहेत. तथापि, कोणत्याही अधिकाऱ्याना या हातपंप कामगारांनाआतपर्यंत नियमीत करण्यासाठी गांभीर्याने घेतले नाही.घामाचा पैसा खाल्लामागील पदाधिकाऱ्यानी या कामगारांना सेवेत स्थायी करून देतो असे आमिष दाखवले. जिल्ह्यातिल कामगारांकडून पैसाही घेतला पण त्या कर्मचाऱ्याच्या घामाचा पैसा वाया गेला .विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातिल कामगारांना वगळून इतर सर्व जिल्ह्यात हातपंप कामगारांना जिल्हा परिषदेने शासकीय सेवेत सामावून घेतले आहे. पण भंडारा जिल्ह्याशेजारच्या जिल्हा परिषदेनी या कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी वेटिंगवर ठेवले आहे.दिवाळी अंधारातहातपंप दुरुस्त करणाऱ्या सामान्य कामगारांच्या घरची दिवाळी अंधारात गेली. सप्टेंबर महिन्यापासून त्या कामगारांना मानधन देण्यात आले नाही.

टॅग्स :Waterपाणी