निम्मे भंडारा शहर अंधारात

By Admin | Updated: June 11, 2014 23:08 IST2014-06-11T23:08:26+5:302014-06-11T23:08:26+5:30

मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना

Half Honda City | निम्मे भंडारा शहर अंधारात

निम्मे भंडारा शहर अंधारात

वीज कंपनीविरूध्द आक्रोश : नागरिकांनी काढली रात्र उकाड्यात
भंडारा : मंगळवारला सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरु झाला असला तरी बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना रात्र अक्षरक्ष: उकाड्यात काढावी लागली. एकीकडे ऊन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असताना वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागला. दुपारी ५ वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी १२ वाजतापर्यंत बंदच होता.

वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून काही वेळात वीज पुरवठा सुरळीत होईल, या हेतूने वाट पाहत राहिले. त्यानंतर तक्रार नोंदवूनही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही.
तक्रार नोंदणी केंद्र बेपत्ता
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदणी कार्यालयात (२५२३५५) या क्रमांकावर संपर्क साधला असता तिथे संपर्क झाला नाही. हे कार्यालय कुठे असे विचारले असता, वीज कंपनीचे अधिकारी पांडे महालात हे कार्यालय असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी पांडे महाल गाठले असता तिथे कार्यालय नसल्याचे समोर आहे. अधिक शोध घेतला असता एका गल्लीबोळात हे कार्यालय दिसून आले. तिथे तक्रार नोंदविल्यानंतर लाईनमन पाठवितो, एवढेच उत्तर कर्मचाऱ्याने दिले.
त्यानंतर उपविभागीय अभियंता अमित परांजपे यांना ६००७, ६००८, ६००९, ६०१० यांना या खांबावरून वीज पुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी कनिष्ठ अभियंत्याशी संपर्क साधण्यासाठी सांगितले. कनिष्ठ अभियंत्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागपूर मुख्यालयातील मुख्य अभियंता कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांच्याशी संपर्क साधून विजेची समस्या सांगावी लागली. वीज गेली तर वीज ग्राहकांचे समाधान करणारी यंत्रणा वीज वितरण विभागाकडे नाही.
उपविभागीय अभियंता प्रसाद रेशमे हे भंडाऱ्यात असताना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जी यंत्रणा उभारली होती, ती सर्व यंत्रणा अलिकडच्या काळात कोलमडून पडली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
चार दिवसांपूर्वी कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड आल्यानंतर गडेगाव उपकेंद्रातून पाच फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भंडारा व लाखनी तालुक्यातील ३२५ गावातील नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक हैरान झाले असून असा प्रकार वारंवार होत असल्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Half Honda City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.