शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:05 IST

जीवनदायीनी वैनगंगा व बावनथडी या प्रमुख नद्यांचे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धातच वाळवंट झाले आहे. दक्षिणी वाहिनी म्हणून ओळख असलेल्या नद्या कोरड्या पडल्याने भीषण जलसंकट निर्माण झाल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

ठळक मुद्देपाणी सोडण्याची गरज : वैनगंगा, बावनथडी नदीचे पात्र कोरडे

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायीनी वैनगंगा व बावनथडी या प्रमुख नद्यांचे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धातच वाळवंट झाले आहे. दक्षिणी वाहिनी म्हणून ओळख असलेल्या नद्या कोरड्या पडल्याने भीषण जलसंकट निर्माण झाल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. एप्रिलच्या शेवटी नदीचा प्रवाह बंदची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांसह पशुधनाकरिता कवलेवाडा बॅरेज व बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची गरज आहे.वैनगंगा व बावनथडी नदीचा उगम मध्य प्रदेशात झाला आहे. वैनगंगा नदीचा तुमसर, मोहाडी व भंडाा असा १०० किमीचा प्रवास आहे. तर बावनथडी नदी वैनगंगेत सामावते. बावनथडी नदीवर सीतेकसा येथे बावनथडी (राजीवनगर) धरण बांधण्यात आले तर वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी व धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरिता बॅरेज तयार करण्यात आले आहे.दोन्ही नद्यांचे पाणी अडविल्याने वैनगंगा व बावनथडी नदीचा प्रवाह उन्हाळ्यात संथ होऊन पुढे तो प्रवाह बंद होतो. एप्रिल ते जून पर्यंत दोन्ही नद्यांचे मात्र वाळवंट बनते. दोन्ही मोठ्या नद्या असून त्यांचे विस्तीर्ण असे पात्र आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात वैनगंगा व बावनथडी नदी पात्र कोरडे पडले आहे. दोन्ही नदी पात्रातील काठावर किमान ४५ ते ५० गावांपेक्षा जास्त गावे आहेत. त्या गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पशुधनाची संख्या मोठी आहे.पिण्याच्या पाण्याला प्राधान्यपाणी लवाद व केंद्रीय जलबोर्ड आयोगाने नदीतील वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्याचा उपयोग प्रथम पिण्याकरिता, सिंचनाकरिता व नंतर उद्योगाकरिता करावा असा नियम तयार केला आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यात प्रथम उद्योगाला प्राधान्य दिला तरी उन्हाळ्यात प्रथम पिण्याकरिता पाण्याचा विंसर्ग करण्याची गरज आहे.नैसर्गिक स्रोत नाहीतुमसर तालुक्यात चांदपूर, बघेडा, कारली येथे मोठे तलाव आहेत. या व्यतिरिक्त पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. कवलेवाडा, बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा निसर्गाशिवाय येथे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. बावनथडी प्रकल्पात सध्या २५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर कवलेवाडा बॅरेजमध्ये मोठा जलसाठा उपलब्ध आहे.प्रवाहाची निरंतरताकेंद्रीय जलबोर्ड आयोग तथा पर्यावरण विभागाने नदीवरील धरण तथा बॅरेज तयार झाल्यानंतर त्यातून पाण्याचा कायम विसर्ग सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वक्रदारातून सतत पाणी नदी पात्रात विसर्ग सुरु राहतो. परंतु त्याची गती व वक्रद्वार किती उंचीपर्यंत सुरु ठेवावा त्याची नियमावली आहे. प्रकल्पात अथवा बॅरेजमध्ये जलसाठा उपलब्ध राहून नदी प्रवाह बंद होऊ दिला जात नाही. याची खबरदारी संबंधित विभाग घेतो परंतु उन्हाळ्यात पाण्याचा मोठा उपयोग व सुर्याची दाहकता यामुळे पाण्याचा प्रवाह निश्चित बंद होतो.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई