शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हरित क्रांती...

By किरण अग्रवाल | Updated: July 29, 2018 01:16 IST

सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे शक्य होते. हरित महाराष्ट साकारण्यासंदर्भातही तेच घडून येताना दिसत आहे. यातील आकडेवारीच्या पडताळणीत न पडताही सदर उपक्रमाचे यश दिसून येणारे आहे.

ठळक मुद्देयंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड करून हरित महाराष्ट साकारण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार राज्यभर मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ सरकारी पातळीवर किंवा वनविभागापुरती मर्यादित न राहता लोकांचा सहभाग त्यात मिळवण्यात यंत्रणांना यश आले. पर्यावरण रक्षणाबाबतची एकूणच जाणीवजागृती पाहता वृक्षलागवड मोहिमेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतो आहे. ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थाच नव्हे तर, शाळा-शाळांमधील विद्यार्थीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळेच जुलै महिना संपायला आठवडा शिल्लक असताना राज्यात सुमारे १२ कोटी वृक्षलागवड झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा वेग अगर प्रतिसाद पाहता जुलैअखेर उद्दिष्टापेक्षाही अधिकच आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यात नांदेड जिल्हा आघाडीवर असून, नाशिक दुसºयास्थानी आहे. नाशिक जिल्ह्यात ६७ लाख १७ हजार रोपे लावली गेल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. यातील आकडेवारी अचाट असली तरी, शासकीय यंत्रणांखेरीज विविध संस्थांतर्फे तसेच उद्योग समूहांतर्फे यासाठी चालविले जात असलेले प्रयत्न मात्र नक्कीच नजरेत भरणारे आहेत. जनसामान्यांमध्ये यासंदर्भात जागलेली सजगता यातून अधोरेखित होणारी असून, तीच महत्त्वाची तसेच आश्वासक दिलासा देणारी आहे. ‘लोकमत’ माध्यम समूहानेही यात खारीचा वाटा उचलत चालू शैक्षणिक वर्षात शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये रोपे वाटप केलीत. विविध मोहिमांतर्गत ही वृक्षलागवड होत आहेच; परंतु काही उद्योग समूहांनीही त्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे केवळ लागवडीपुरता ही मोहीम न उरता पाऊस नसल्यास टॅँकरद्वारे पाणी घालून वृक्ष जगविण्याची, वाढविण्याची संबंधितांची धडपड कौतुकास्पद ठरली आहे. अर्थात, शासकीय जागांवर वृक्षारोपण करताना उद्योगसमूहांना विविध निकषांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत असण्याच्या तक्रारी आहेत; पण सामाजिक जबाबदारीचे भान बाळगणारे समूह त्या दिव्यालाही सामोरे जात नेटाने आपले काम करीत आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या ध्येयपूर्तीला असे असंख्य हात लागलेले आहेत. यातून नव्याने हरित क्रांती घडवून आणणारी मोठी चळवळच उभी राहिल्याचे समाधान त्यातील आकडेवारीपेक्षा कितीतरी मोठे मानता यावे, असेच आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग