शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

करडीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांची पायपीट : पाणी पुरवठा योजनेची प्लास्टीक टँक उतरविली खाली

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथे पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करू पाहत आहे. आंबेडकर वॉर्डात पाण्याची टँक बसविण्यात आली. परंतु त्या योजनेतून नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. रिकामी पाण्याची टँक खाली काढण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतकडे रस्ते व नाली बांधकामासाठी पैसे आहेत. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नाहीत काय? असा प्रश्न विचारला जात आहे.पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली. नवीन पाईप लावण्याचा प्रयत्नही झाला. परंतु तरीही आंबेडकर वॉर्डातील समस्या सुटलेली नाही.आंबेडकर वॉर्डात योजनेवर लावलेली पाण्याची प्लास्टीक टाकी रिकामी असून ती आता गांधी वॉर्डातील मागील भागात रिकामी पडलेली आहे. सध्या ती कुठेच वापरण्यात आलेली नाही. त्या टँकला जर भागवत डोहळे यांच्या घराजवळ मांडली तर तिकडील समस्या दूर होते. पण आंबेडकर वॉर्डातील समस्या मात्र जैसे थेच राहते.सध्या नागरिकांना गुंडभर पाणी मिळत नसल्याने आक्रोश वाढीस लागला आहे. ग्रामपंचायतीकडे रोड व नाल्यांसाठी पैसा आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालीत त्वरीत समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नळधारक मोहन किरणापुरे, वासुदेव काळे, जयदेव काळे, राजेश डोहळे, भास्कर साठवणे, भागवत डोहळे, शामराव डोहळे व इतर घरगुती नळधारकांनी केली आहे.आंबेडकर वॉर्डात सर्व ठिकाणी पाण्याची समस्या नाही तर फक्त काही घरापुरती आहे. पाणी समस्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न झालेत. नवे पाईप जोडून पाहिले, परंतु सुधारणा झालेली नाही. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असून गाई-म्हशी धुतल्या जातात. समस्येवर उपाययोजनेसाठी विद्युत वितरण कंपनीला सकाळी एक तास वीज पुरवठा बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही.- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.

टॅग्स :water shortageपाणीकपात