शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

करडीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांची पायपीट : पाणी पुरवठा योजनेची प्लास्टीक टँक उतरविली खाली

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथे पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करू पाहत आहे. आंबेडकर वॉर्डात पाण्याची टँक बसविण्यात आली. परंतु त्या योजनेतून नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. रिकामी पाण्याची टँक खाली काढण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतकडे रस्ते व नाली बांधकामासाठी पैसे आहेत. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नाहीत काय? असा प्रश्न विचारला जात आहे.पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली. नवीन पाईप लावण्याचा प्रयत्नही झाला. परंतु तरीही आंबेडकर वॉर्डातील समस्या सुटलेली नाही.आंबेडकर वॉर्डात योजनेवर लावलेली पाण्याची प्लास्टीक टाकी रिकामी असून ती आता गांधी वॉर्डातील मागील भागात रिकामी पडलेली आहे. सध्या ती कुठेच वापरण्यात आलेली नाही. त्या टँकला जर भागवत डोहळे यांच्या घराजवळ मांडली तर तिकडील समस्या दूर होते. पण आंबेडकर वॉर्डातील समस्या मात्र जैसे थेच राहते.सध्या नागरिकांना गुंडभर पाणी मिळत नसल्याने आक्रोश वाढीस लागला आहे. ग्रामपंचायतीकडे रोड व नाल्यांसाठी पैसा आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालीत त्वरीत समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नळधारक मोहन किरणापुरे, वासुदेव काळे, जयदेव काळे, राजेश डोहळे, भास्कर साठवणे, भागवत डोहळे, शामराव डोहळे व इतर घरगुती नळधारकांनी केली आहे.आंबेडकर वॉर्डात सर्व ठिकाणी पाण्याची समस्या नाही तर फक्त काही घरापुरती आहे. पाणी समस्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न झालेत. नवे पाईप जोडून पाहिले, परंतु सुधारणा झालेली नाही. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असून गाई-म्हशी धुतल्या जातात. समस्येवर उपाययोजनेसाठी विद्युत वितरण कंपनीला सकाळी एक तास वीज पुरवठा बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही.- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.

टॅग्स :water shortageपाणीकपात