शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

करडीत पाणी समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकांची पायपीट : पाणी पुरवठा योजनेची प्लास्टीक टँक उतरविली खाली

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथे पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करू पाहत आहे. आंबेडकर वॉर्डात पाण्याची टँक बसविण्यात आली. परंतु त्या योजनेतून नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. रिकामी पाण्याची टँक खाली काढण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतकडे रस्ते व नाली बांधकामासाठी पैसे आहेत. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नाहीत काय? असा प्रश्न विचारला जात आहे.पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असलेले नळधारक पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. हिवाळा व उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झालेला असताना पाण्याची समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीला वारंवार माहिती दिली जात असताना याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नळधारकांचा आहे. ग्रामपंचायतीचे माध्यमातून यापूर्वी पाईपलाईन इकडून तिकडे बदलविण्यात आली. नवीन पाईप लावण्याचा प्रयत्नही झाला. परंतु तरीही आंबेडकर वॉर्डातील समस्या सुटलेली नाही.आंबेडकर वॉर्डात योजनेवर लावलेली पाण्याची प्लास्टीक टाकी रिकामी असून ती आता गांधी वॉर्डातील मागील भागात रिकामी पडलेली आहे. सध्या ती कुठेच वापरण्यात आलेली नाही. त्या टँकला जर भागवत डोहळे यांच्या घराजवळ मांडली तर तिकडील समस्या दूर होते. पण आंबेडकर वॉर्डातील समस्या मात्र जैसे थेच राहते.सध्या नागरिकांना गुंडभर पाणी मिळत नसल्याने आक्रोश वाढीस लागला आहे. ग्रामपंचायतीकडे रोड व नाल्यांसाठी पैसा आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीने पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालीत त्वरीत समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नळधारक मोहन किरणापुरे, वासुदेव काळे, जयदेव काळे, राजेश डोहळे, भास्कर साठवणे, भागवत डोहळे, शामराव डोहळे व इतर घरगुती नळधारकांनी केली आहे.आंबेडकर वॉर्डात सर्व ठिकाणी पाण्याची समस्या नाही तर फक्त काही घरापुरती आहे. पाणी समस्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न झालेत. नवे पाईप जोडून पाहिले, परंतु सुधारणा झालेली नाही. नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असून गाई-म्हशी धुतल्या जातात. समस्येवर उपाययोजनेसाठी विद्युत वितरण कंपनीला सकाळी एक तास वीज पुरवठा बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही.- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.

टॅग्स :water shortageपाणीकपात