ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामसभेचा विसर

By Admin | Updated: January 28, 2015 23:10 IST2015-01-28T23:10:29+5:302015-01-28T23:10:29+5:30

पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती.

Gram Panchayat office bearers forgot about Gram Sabha | ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामसभेचा विसर

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामसभेचा विसर

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती. काही ग्रामस्थानी आपली समस्या घेवून ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. सरपंच व तीन सदस्यांची उपस्थिती पाहून ग्रामस्थ चकीत झाले. एक तास होवून सदस्य उपस्थित झाले नव्हते.
ग्रामपंचायत सदस्यांनाच ग्रामसभेचे महत्व माहित नसतील तर गावकऱ्यांना ग्रामसभेचे महत्व कोण सांगणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. ९ सदस्यासह ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. मागील अनेक महिन्यापासून ग्रामपंचायत सदस्यामध्ये आपसी मतभेद पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. गावात समस्येला उधान आले आहे. येथे महिला सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे गावाचा कारभार सांभाळत आहेत. गावात प्रवेश करण्यापुर्वी नाकाला रूमाल बांधावी लागते. आबादी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. घाणीमुळे नाल्या भरलेल्या आहेत. लक्षावधी रूपये खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी धुळ खात आहेत.
प्रशासनाकडून वर्षाला चार ग्रामसभा घेतल्या जातात. मात्र ग्रामस्थाच्या अल्प उपस्थितीमुळे ग्रामसभा तहकूब होत आहेत. भविष्यात अशा ग्रामसभा बंद होण्याचे चिन्ह पाहायला मिळत आहेत. ग्रामसभा ही जनतेच्या गावाच्या विकासात्मक कामासाठी असते. मात्र ही जाणीव जनतेमध्ये दिसत नाही. पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे जनता विकासापासून कोसो दूर आहे. (वार्ताहर)

Web Title: Gram Panchayat office bearers forgot about Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.