शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गरजूंना धान्य वितरण आणि बेघरांची वसतिगृहात सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद ...

ठळक मुद्देसंडे अँकर । ठिकठिकाणी अडकलेल्या जिल्ह्यातील गरीब व मजुरांची माहिती नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद आहे. या काळात गोर गरीबांचे हाल होवू नये. कुणीही अन्नधान्या वाचून अडचणीत येवू नये, यासाठी प्रशासनाने गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा सुरू केला आहे. तर जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या बेघरांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था वसतीगृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडी असली तरी हाताला काम नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. हा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गोरगरीबापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याची व्यवस्था करीत आहेत. भंडारा शहरात उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध ठिकाणी धान्याचे पॅकेट वाटप केले जात आहे. तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने लाखांदूर तालुक्यातील गरजू व मजुरांसाठी एक क्विंटल तांदूळ देण्यात आले आहे.शहरात असलेल्या बेघर व भिकाऱ्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था शासकीय वसतीगृहात करण्यात आली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग प्रमाणे राहण्याची सोय असणार आहे. शहरातील विविध भागात असलेल्या अशा बेघर भिकाऱ्यांचे सर्व्हेक्षण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांना त्याठिकाणी हलविले जात आहे.शिवभोजन केंद्र सुरूकोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाच्या शक्यतेने येथील जिल्हा परिषद उपहारगृहात असलेले शिवभोजन केंद्र बंद करण्यात आले होेते. मात्र शनिवारपासून सदर केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शनिवारी केंद्र सुरू झाले. याठिकाणी सुद्धा सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येणार आहे. या केंद्राची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदीप काठोळे यांच्याकडे देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना संचारबंदीच्या काळात भोजन मिळावे, हा या मागचा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या असून त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.विविध समन्वय समित्याकोरोना उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी विविध समित्या गठित केल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू पुरवठा व व्यवस्थापन सनियंत्रण समिती, जनजागृती समिती, संपर्क शोधक समिती, तालुकास्तरीय सनियंत्रण समिती, वैद्यकीय व आरोग्य विषयक वस्तू व सेवापुरवठा समन्वय समिती, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय समन्वय समिती, नागरिक भागातील व्यवस्थापन विषयक समिती गठित करण्यात आली आहे. जबाबदार अधिकाºयाची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना या साथ रोगाचा एकजुटीने मुकाबला करू या. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे व आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक