शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सरकार हमी भाव केंद्र न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 25, 2016 01:22 IST

जगाचा अन्नदाता सुमार संकटात आला आहे. पोषिंदाच मरनासन्न जीवन जगत असतांना लोकशाहीत त्याला किंमत नाही का?

धान पिकविणे व विकणे फारच कठीण : व्यापारी मालामाल शेतकरी कंगालपालांदूर : जगाचा अन्नदाता सुमार संकटात आला आहे. पोषिंदाच मरनासन्न जीवन जगत असतांना लोकशाहीत त्याला किंमत नाही का? जिसकी लाठी उसकी भैस, समिकरणाने शासन-प्रशासन खेळीमेळीने चालत असून अन्नदात्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जिल्हाभर हमीााव केंद्र सुरु आहेत पण शेतकरी त्यापासून बराच लांब आहे. सरकार आम्हालाही हमी भावात धान्य विकू द्या अशी आर्त हाक देतो आहे.बदलत्या काळानुसार स्वत:ला बदलत शेतकरी बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. एका उत्पन्नावर उदरनिर्वाह शक्य नसल्याने स्वतंत्र सिंचन सुविधा निर्माण करुन खरीब रब्बीत धान पिकाविण्याचा प्रयत्न केला आहे. लहरी निसर्गामुळे पावसाळ्यात उन्हाळा तर उन्हाळ्यात पावसाळा अशी स्थिती तयार झाली आहे.त्यामुळे धान पिकवायला खर्च व त्रास वाढला आहे. शेतात धानाशिवाय उपाय नसल्याने निरुपयाने धानच पिकवावे लागते. एकरी खर्च २०,०००च्या घरात आहे. एवढा खर्च करुन २५ ते ३० हजाराचे धान विकायला नाना संकटे उभी आहेत. हमी भाव केंद्राची संख्याच अत्यल्प असल्याने हमीभाव केंद्रावर तोबा गर्दी असते. हमीभाव केंद्रावर जागेची कमतरता असते.उन्ह-पावसात खुल्या आकाशाखाली गुऱ्हांच्या सानिध्यात रामभरोसे ठेवावी लागत आहेत. केंद्र एक गाव अनेक, हजार शेतकरी यामुळे मोजणीला नंबर येईपर्यंत जीव टांगणीला असते. हाडाची काडी रक्ताचे पाणी करुन अख्ख कुटूंब राबराब राबून केवळ मोजणीकरिता धान वाऱ्यावर सोडणे जिव्हारी लागत आहे. तेव्हा सरकार गाव तिथ हमी भाव केंद्र द्या अशी एकमुखी मागणी घोडेझरीचे शेतकरी सुनिल लुटे यांनी केली आहे.हमी भाव केंद्रापर्यंत माल आणायला ३०-४० रुपये प्रती पोती खर्च येतो आहे. दिवसागणीक खर्च वाढतच आहे. त्या प्रमाणात भाववाढ होत नाही नाममात्र ५० रु. प्रतिक्विंटल वाढवून धान उत्पादकांच्या तोंडाला पान पुसल्या जातात. खरचं ह ेउचित आहे काय? रोजगार हमी योजनेवर नाहक खर्च केला जातो. रोजगार हमीत कामाचे नियोजन नाही. लहान नाले सरळीकरणाच्या नावाखाली करोडोची उधळण केली जाते. दरवर्षी एकच काम करुन पैसा खर्च होतो. मजुरांना काम देण्याचे कारण पुढे करुन मजुरांना आळशी बनविले जाते. रोजगार हमीमुळे शेतकामाला मजुर मिळत नाही. मिळाले तर दुप्पट रोजी मोजावी लागते. मजुरांना सोन्याचे दिवस आले असून शेतकरी मात्र मातीमोलच आहे. धान कापणीला मजूर मिळेना, बांधणीला विचारेना एवढी भयावह, स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. पूर्वी शेतकरी मजुर सलोख्याने गावरिवाजाराने रोजी ठरवून काम केले जाई. मात्र आता मजुर घरीच टेशाने विचारतो घामाचा काय दाम आहे. हतबल शेतकरी म्हणतो तुम्ही म्हणाल ते देतो पण कामाला चला. रोजगार हमी सुरु असणाऱ्या ठिकाणावर जाऊ पहाले तर घरचे काम तिथे केले जातात. विचारणा केली असता मजूर म्हणतो राकारणी अधिकारी खातात आम्ही थोडेसे खाल्ले तर काय बिघडले? ही आजची वास्तविकता चिंतनाचा विषय आहे. रब्बी संपून खरीब तोंडावर आला तरी रोजगार हमी संपेना.धान खरेदी केंद्रावर पारदर्शक काम नसल्याने व वरिष्ठ अधिकारी उन्हात कार्यालयाबाहेर निघत नसल्याने व्यापाऱ्यांचा बोलबाला असतो. पैसा फेको तमाशा देखो या नियमाने सर्व आलबेल असतो. जिल्ह्यात गतीमान नाही. तेव्हा धानखरेदी केंद्र वाढवा, नगदी चुकारे द्या, लहान शेतकऱ्यांना प्राधान्य द्या, पादर्शक कामाची जबाबदारी स्विकारा व बळीराजाला खऱ्या अर्थाने राजा बनवा अशी मागणी आहे. (वार्ताहर)