शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

सरकार हमी भाव केंद्र न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 25, 2016 01:22 IST

जगाचा अन्नदाता सुमार संकटात आला आहे. पोषिंदाच मरनासन्न जीवन जगत असतांना लोकशाहीत त्याला किंमत नाही का?

धान पिकविणे व विकणे फारच कठीण : व्यापारी मालामाल शेतकरी कंगालपालांदूर : जगाचा अन्नदाता सुमार संकटात आला आहे. पोषिंदाच मरनासन्न जीवन जगत असतांना लोकशाहीत त्याला किंमत नाही का? जिसकी लाठी उसकी भैस, समिकरणाने शासन-प्रशासन खेळीमेळीने चालत असून अन्नदात्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जिल्हाभर हमीााव केंद्र सुरु आहेत पण शेतकरी त्यापासून बराच लांब आहे. सरकार आम्हालाही हमी भावात धान्य विकू द्या अशी आर्त हाक देतो आहे.बदलत्या काळानुसार स्वत:ला बदलत शेतकरी बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. एका उत्पन्नावर उदरनिर्वाह शक्य नसल्याने स्वतंत्र सिंचन सुविधा निर्माण करुन खरीब रब्बीत धान पिकाविण्याचा प्रयत्न केला आहे. लहरी निसर्गामुळे पावसाळ्यात उन्हाळा तर उन्हाळ्यात पावसाळा अशी स्थिती तयार झाली आहे.त्यामुळे धान पिकवायला खर्च व त्रास वाढला आहे. शेतात धानाशिवाय उपाय नसल्याने निरुपयाने धानच पिकवावे लागते. एकरी खर्च २०,०००च्या घरात आहे. एवढा खर्च करुन २५ ते ३० हजाराचे धान विकायला नाना संकटे उभी आहेत. हमी भाव केंद्राची संख्याच अत्यल्प असल्याने हमीभाव केंद्रावर तोबा गर्दी असते. हमीभाव केंद्रावर जागेची कमतरता असते.उन्ह-पावसात खुल्या आकाशाखाली गुऱ्हांच्या सानिध्यात रामभरोसे ठेवावी लागत आहेत. केंद्र एक गाव अनेक, हजार शेतकरी यामुळे मोजणीला नंबर येईपर्यंत जीव टांगणीला असते. हाडाची काडी रक्ताचे पाणी करुन अख्ख कुटूंब राबराब राबून केवळ मोजणीकरिता धान वाऱ्यावर सोडणे जिव्हारी लागत आहे. तेव्हा सरकार गाव तिथ हमी भाव केंद्र द्या अशी एकमुखी मागणी घोडेझरीचे शेतकरी सुनिल लुटे यांनी केली आहे.हमी भाव केंद्रापर्यंत माल आणायला ३०-४० रुपये प्रती पोती खर्च येतो आहे. दिवसागणीक खर्च वाढतच आहे. त्या प्रमाणात भाववाढ होत नाही नाममात्र ५० रु. प्रतिक्विंटल वाढवून धान उत्पादकांच्या तोंडाला पान पुसल्या जातात. खरचं ह ेउचित आहे काय? रोजगार हमी योजनेवर नाहक खर्च केला जातो. रोजगार हमीत कामाचे नियोजन नाही. लहान नाले सरळीकरणाच्या नावाखाली करोडोची उधळण केली जाते. दरवर्षी एकच काम करुन पैसा खर्च होतो. मजुरांना काम देण्याचे कारण पुढे करुन मजुरांना आळशी बनविले जाते. रोजगार हमीमुळे शेतकामाला मजुर मिळत नाही. मिळाले तर दुप्पट रोजी मोजावी लागते. मजुरांना सोन्याचे दिवस आले असून शेतकरी मात्र मातीमोलच आहे. धान कापणीला मजूर मिळेना, बांधणीला विचारेना एवढी भयावह, स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. पूर्वी शेतकरी मजुर सलोख्याने गावरिवाजाराने रोजी ठरवून काम केले जाई. मात्र आता मजुर घरीच टेशाने विचारतो घामाचा काय दाम आहे. हतबल शेतकरी म्हणतो तुम्ही म्हणाल ते देतो पण कामाला चला. रोजगार हमी सुरु असणाऱ्या ठिकाणावर जाऊ पहाले तर घरचे काम तिथे केले जातात. विचारणा केली असता मजूर म्हणतो राकारणी अधिकारी खातात आम्ही थोडेसे खाल्ले तर काय बिघडले? ही आजची वास्तविकता चिंतनाचा विषय आहे. रब्बी संपून खरीब तोंडावर आला तरी रोजगार हमी संपेना.धान खरेदी केंद्रावर पारदर्शक काम नसल्याने व वरिष्ठ अधिकारी उन्हात कार्यालयाबाहेर निघत नसल्याने व्यापाऱ्यांचा बोलबाला असतो. पैसा फेको तमाशा देखो या नियमाने सर्व आलबेल असतो. जिल्ह्यात गतीमान नाही. तेव्हा धानखरेदी केंद्र वाढवा, नगदी चुकारे द्या, लहान शेतकऱ्यांना प्राधान्य द्या, पादर्शक कामाची जबाबदारी स्विकारा व बळीराजाला खऱ्या अर्थाने राजा बनवा अशी मागणी आहे. (वार्ताहर)