शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

'ढकलपास'चा शासनाचा फतवा!

By admin | Updated: April 16, 2016 00:26 IST

इयत्ता पहिलीपासून आठव्या वर्गापर्यत कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणानंतर आता इयत्ता नववीच्या परीक्षेतही सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेवून ...

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : दहावीत जाण्याचा मार्ग मोकळा भंडारा: इयत्ता पहिलीपासून आठव्या वर्गापर्यत कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणानंतर आता इयत्ता नववीच्या परीक्षेतही सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेवून एकप्रकारे 'ढकलपास' चा 'फतवा' शासनाने काढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणाला ब्रेक लागणार आहे.आपापल्या शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी अनेक शाळा अभ्यासात अप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करतात. यामुळे मात्र, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन नववीतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. पर्यायाने नवव्या वर्गातून अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थ्यांना आता 'ढकलपास' या प्रकारामुळे दहाव्या वर्गाला प्रवेश मिळणार यात शंका नाही. नवव्या वर्गानंतर कुठल्याच विद्यार्थ्यांने शाळा सोडू नये, असे उद्दिष्ट शिक्षण विभागाने निश्चित केले असले तरी मुलांसह अनेक मुलं शाळा सोडत असल्याचे निदर्शनात आले आहे. जी मुले अभ्यासात मागे आहेत, त्यांना नववीतच अनुत्तीर्ण करण्याचे प्रकार कित्येक शाळांमधून होते. दहावीत हमखास उत्तीर्ण होतील, अशाच विद्यार्थ्यांना नववीत उत्तीर्ण केले जाते. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना विशेष सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निकालानंतर ३० दिवसाच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करून १० जुलैच्या आत पुर्नपरीक्षा घ्यावी आणि १० जुलैच्या आत निकाल जाहीर करावा. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २१ जुलैपासून दहावीच्या वर्गात बसविण्यात यावे अशा सूचना आहेत. उपाययोजना केल्यानंतरही ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जास्त असेल, त्या शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)इयत्ता नववीच्या परीक्षेत कुणालाही अनुत्तीर्ण न करण्याचा शासनाचा निर्णय हा योग्य आहे. महत्वाचे म्हणजेच त्यांची गळती होवू नये हा त्यामागील उद्देश आहे. शिक्षकांनी सुद्धा तसे त्यांचेकडे जबाबदारीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या निर्णयाचा भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार असून, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भात सर्व शाळांना सूचित केले असून, विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. -किसन शेंडेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,भंडारापालकांमध्ये चिंतापहिलीपासून आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचे निर्देश आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी पुरेसा अभ्यास करीत नाहीत. पर्यायाने ते अध्ययनाकडून दूर जात आहेत. त्यातच आता नव्याने नववीतही अनुत्तीर्ण न करण्याच्या निर्देशामुळे विद्यार्थी अभ्यासच करणार नाहीत.'ढकलपास' प्रकारामुळे दहावीपर्यंत कसेबसे खेचले जातील, मात्र तेथून पुढे काय, असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. या निर्णयामुळे शिक्षकांसोबतच पालकांमधूनही शासनाच्या या निर्णयास विरोध होत असल्याचे दिसून येते.