शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

'ढकलपास'चा शासनाचा फतवा!

By admin | Updated: April 16, 2016 00:26 IST

इयत्ता पहिलीपासून आठव्या वर्गापर्यत कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणानंतर आता इयत्ता नववीच्या परीक्षेतही सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेवून ...

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : दहावीत जाण्याचा मार्ग मोकळा भंडारा: इयत्ता पहिलीपासून आठव्या वर्गापर्यत कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणानंतर आता इयत्ता नववीच्या परीक्षेतही सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेवून एकप्रकारे 'ढकलपास' चा 'फतवा' शासनाने काढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणाला ब्रेक लागणार आहे.आपापल्या शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी अनेक शाळा अभ्यासात अप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करतात. यामुळे मात्र, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन नववीतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. पर्यायाने नवव्या वर्गातून अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थ्यांना आता 'ढकलपास' या प्रकारामुळे दहाव्या वर्गाला प्रवेश मिळणार यात शंका नाही. नवव्या वर्गानंतर कुठल्याच विद्यार्थ्यांने शाळा सोडू नये, असे उद्दिष्ट शिक्षण विभागाने निश्चित केले असले तरी मुलांसह अनेक मुलं शाळा सोडत असल्याचे निदर्शनात आले आहे. जी मुले अभ्यासात मागे आहेत, त्यांना नववीतच अनुत्तीर्ण करण्याचे प्रकार कित्येक शाळांमधून होते. दहावीत हमखास उत्तीर्ण होतील, अशाच विद्यार्थ्यांना नववीत उत्तीर्ण केले जाते. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना विशेष सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निकालानंतर ३० दिवसाच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करून १० जुलैच्या आत पुर्नपरीक्षा घ्यावी आणि १० जुलैच्या आत निकाल जाहीर करावा. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २१ जुलैपासून दहावीच्या वर्गात बसविण्यात यावे अशा सूचना आहेत. उपाययोजना केल्यानंतरही ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जास्त असेल, त्या शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)इयत्ता नववीच्या परीक्षेत कुणालाही अनुत्तीर्ण न करण्याचा शासनाचा निर्णय हा योग्य आहे. महत्वाचे म्हणजेच त्यांची गळती होवू नये हा त्यामागील उद्देश आहे. शिक्षकांनी सुद्धा तसे त्यांचेकडे जबाबदारीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या निर्णयाचा भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार असून, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भात सर्व शाळांना सूचित केले असून, विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. -किसन शेंडेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,भंडारापालकांमध्ये चिंतापहिलीपासून आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचे निर्देश आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी पुरेसा अभ्यास करीत नाहीत. पर्यायाने ते अध्ययनाकडून दूर जात आहेत. त्यातच आता नव्याने नववीतही अनुत्तीर्ण न करण्याच्या निर्देशामुळे विद्यार्थी अभ्यासच करणार नाहीत.'ढकलपास' प्रकारामुळे दहावीपर्यंत कसेबसे खेचले जातील, मात्र तेथून पुढे काय, असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. या निर्णयामुळे शिक्षकांसोबतच पालकांमधूनही शासनाच्या या निर्णयास विरोध होत असल्याचे दिसून येते.