शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

गोसीखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:12 IST

विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच : चौरास भागात डाव्या कालव्याचा एकही काम सुरु नाही

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.पवनी तालुक्यातील गोसे येथे १९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३६२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटीच्या वर गेली आहे. तीन नवे व मूळ धरणाच्या किमतीत २५ पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकºयांपर्यंत या धरणातील पाणी पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडीप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोट्यवधी टीएमसी पाण्याचा उपयोग शेतकºयांच्या शेतातील शेतीला अजिबात घेताना दिसत नाही.आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमीटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावापर्यंत पोहचत आहे. यात १२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध होत असून ६४ हजार हेक्टर सिंचनाची व्यवस्था केली आहे.नव्याने बांधकाम करावे लागत असल्याने आतापर्यंतचा या कामावरील खर्चही वाया गेला आहे. ाा कालव्याची ४४१ कोटी रुपयाची अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंतच्या हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.मात्र एवढे होऊन डाव्या कालव्यापासून चौरास भागात ज्या बाजूला गेट लावून कालवे काढावयाचे आहेत तेही काम थंडबस्त्यात पडलेले आहे. त्यामुळे याहीवर्षी चौरास भागातील शेतकºयांना पाणी मिळण्याची आशा मावळलेली दिसत आहे. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. धरणाचे पाणीही नाही. विहिरीही फेल झाल्या. विजही कमी झाली.डावा कालवा सापडला वादाच्या भोवऱ्यातडाव्या कालव्याचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यातून सापडलेले आहे. हा कालवा गोसेपासून लाखांदूरपर्यंत आहे. या कालव्याची लांबी २२.९३ किलोमीटर आहे. तर सिंचन क्षमता ४०.२०६ हेक्टर आहे. या कालव्याचे काम उच्चप्रतीचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे.