शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

गोसीखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:12 IST

विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच : चौरास भागात डाव्या कालव्याचा एकही काम सुरु नाही

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.पवनी तालुक्यातील गोसे येथे १९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३६२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटीच्या वर गेली आहे. तीन नवे व मूळ धरणाच्या किमतीत २५ पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकºयांपर्यंत या धरणातील पाणी पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडीप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोट्यवधी टीएमसी पाण्याचा उपयोग शेतकºयांच्या शेतातील शेतीला अजिबात घेताना दिसत नाही.आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमीटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावापर्यंत पोहचत आहे. यात १२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध होत असून ६४ हजार हेक्टर सिंचनाची व्यवस्था केली आहे.नव्याने बांधकाम करावे लागत असल्याने आतापर्यंतचा या कामावरील खर्चही वाया गेला आहे. ाा कालव्याची ४४१ कोटी रुपयाची अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंतच्या हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.मात्र एवढे होऊन डाव्या कालव्यापासून चौरास भागात ज्या बाजूला गेट लावून कालवे काढावयाचे आहेत तेही काम थंडबस्त्यात पडलेले आहे. त्यामुळे याहीवर्षी चौरास भागातील शेतकºयांना पाणी मिळण्याची आशा मावळलेली दिसत आहे. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. धरणाचे पाणीही नाही. विहिरीही फेल झाल्या. विजही कमी झाली.डावा कालवा सापडला वादाच्या भोवऱ्यातडाव्या कालव्याचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यातून सापडलेले आहे. हा कालवा गोसेपासून लाखांदूरपर्यंत आहे. या कालव्याची लांबी २२.९३ किलोमीटर आहे. तर सिंचन क्षमता ४०.२०६ हेक्टर आहे. या कालव्याचे काम उच्चप्रतीचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे.