शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

वेगळा विदर्भ द्या, अन्यथा चालते व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:24 IST

स्वतंत्र विदर्भासासाठी टाळाटाळ केली जात असून सत्ताधारी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भाच्या विरोधकांनी वेगळा विदर्भ द्यावे, अन्यथा विदर्भातून चालते व्हावे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विदर्भ राज्य आंदोलन समिती पदाधिकाऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : स्वतंत्र विदर्भासासाठी टाळाटाळ केली जात असून सत्ताधारी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भाच्या विरोधकांनी वेगळा विदर्भ द्यावे, अन्यथा विदर्भातून चालते व्हावे. येत्या १ मे ला होऊ घातलेल्या नागपूर विधानभवनावर ''विदर्भाचा झेंडा लावण्याच्या आंदोलनात'' हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथे पत्रपरीषदेतून केले आहे.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रण राम नेवले, कोअर कमेटी मोरेश्वर बोरकर, जिल्हाध्यक्ष वासुदेव नेवारे, महिला अध्यक्ष पौर्णिमा भिलावे, महिला अध्यक्ष ममता ढोके, तालुकाध्यक्ष विश्वपाल हजारे, महिला अध्यक्ष वर्षा मेंढे, महिला अध्यक्षा अ‍ॅड.नंदा पराते, विजया धोटे, संदीप लोणारे, तालुका सचिव चंद्रशेखर खेडीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.सत्तेत येण्यापुर्वी वेगळा विदर्भ करू असे सांगत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आता वेगळ्या विदर्भावर मौन धारण केले आहे. त्यांनी वैदर्भीय जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, भारनियमन, शेतमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन आता हवेत विरले आहेत. या आश्वासनाच्या उत्तरासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे वेगळा विदर्भ राज्य करणे आहे.५ डिसेंबर २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. पाच हजार लोकांना अटक केली, ९ आॅगस्ट २०१६ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर २० हजार लोकांचा मोर्चा नेला तरी देखील ते बोलले नाही. त्यानंतर ५ डिसेंबर २०१७ ला विधानभवन नागपूर येथे २५ हजार विदर्भवादी व शेतकºयांनी मोर्चा नेला असता सरकार निवेदन घ्यायलाही तयार नाही, म्हणून ११ जानेवारी २०१७ ला संपूर्ण विदर्भभर ८५ ठिकाणी रस्ता रोको चक्का जाम आंदोलन केले. ११ डिसेंबर २०१७ ला विदर्भ बंद आंदोलन झाले. मात्र या सरकारला व ज्यांनी स्वतंत्र विदर्भाचे व शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा जाग येत नाही.विदर्भात ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व रोज शेतकरी मरत आहेत. गेल्या तिन वर्षापासून विदर्भातील १० ही खासदारांनी वैदर्भीय जनतेच्या मागणीनुसार प्रधानमंत्र्यांकडे विदर्भातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ राज्य बाबद साकडे घालून बाध्य करायला पाहिजे होते. मात्र एकही खासदार बोलले नाही. त्यामुळे सर्व खासदारांचे टप्प्या-टप्प्याने राजीनामे मागण्यात येत आहेत.नोटबंदीमुळे तीन लाख लहान मोठे उद्योग बंद झाले. त्यामुळे २ कोटी तरुणांच्या असलेल्या नोकºया गेल्या व राज्य सरकार ३० टक्के नोकऱ्या कमी करणार आहे. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीत आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे.या सर्व सरकारच्या विरोधी धोरणाचा विरोध करून स्वतंत्र विदर्भासाठी १ मे ला महाराष्ट्र दिनाचा निषेध करून नागपूरच्या विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी मार्च काढण्यात येणार आहे. आता नागपूरला महाराष्ट्र राज्याची विधानसभा भरणार नाही तर विदर्भ राज्याची विधानसभा भरेल, असा विश्वास पत्रपरिषदेत दिला.