शालांत परीक्षेत मुलींनी घेतली गुणवत्तेत भरारी
By Admin | Updated: June 10, 2016 00:42 IST2016-06-10T00:42:17+5:302016-06-10T00:42:17+5:30
शालांत परीक्षेचा निकाल सोमवारला घोषीत करण्यात आला. यात मुलींनीच बाजी मारली. बारावीतही मुलींनी निकालात आघाडी घेतली होती.

शालांत परीक्षेत मुलींनी घेतली गुणवत्तेत भरारी
<
strong>बदलीत आढळली अनियमितता : शिक्षण सभापतींनी केली होती आयुक्तांकडे तक्रारभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांनी विभागीय आयुक्तांना केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बोलावून सत्यता पडताळली. त्या तक्रारी सत्यता आढळून आल्यामुळे हे प्रकरण शासनाकडे पाठविले. त्यानंतर शासनाने या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
या बदली कार्यशाळेत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले परंतु निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे बदल्यातील अनियमितता लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी रूजू होऊ नका, असे आवाहन शिक्षकांना केले होते.
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेत ११, १२ व १३ मे रोजी बदल्या