शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 11:39 IST

मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देलाखनीची घटना

भंडारा : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने खचलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले होते. अभ्यास करूनही इतके कमी गुण कसे मिळाले, या विचारातून ती तणावाखाली होती, यातूनच तिने  हा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना सेलोटी रोड, लाखनी येथे बुधवारी सायंकाळी घडली.

मयुरी किशोर वंजारी (वय १८) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती लाखनीच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. बुधवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल घाेषित झाला. त्यात मयूरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले. वर्षभर अभ्यास करूनही कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. याबाबत तिने कुणालाही काही सांगितले नाही. दरम्यान, ४ वाजेच्या सुमारास मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले.

तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ५ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मयूरीचे वडील फर्निचर कामगार म्हणून काम करतात. तिच्या मागे आई, वडील, माेठी बहीण आणि लहान भाऊ, असा परिवार आहे. मयूरीने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीDeathमृत्यूbhandara-acभंडारा