शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 11:39 IST

मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देलाखनीची घटना

भंडारा : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने खचलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले होते. अभ्यास करूनही इतके कमी गुण कसे मिळाले, या विचारातून ती तणावाखाली होती, यातूनच तिने  हा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना सेलोटी रोड, लाखनी येथे बुधवारी सायंकाळी घडली.

मयुरी किशोर वंजारी (वय १८) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती लाखनीच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. बुधवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल घाेषित झाला. त्यात मयूरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले. वर्षभर अभ्यास करूनही कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. याबाबत तिने कुणालाही काही सांगितले नाही. दरम्यान, ४ वाजेच्या सुमारास मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले.

तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ५ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मयूरीचे वडील फर्निचर कामगार म्हणून काम करतात. तिच्या मागे आई, वडील, माेठी बहीण आणि लहान भाऊ, असा परिवार आहे. मयूरीने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीDeathमृत्यूbhandara-acभंडारा