शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

पालांदूर येथे कोरोनाच्या सावटात गरदेव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी म्हणजेच आनंदाची पर्वणीच. हिंदू संस्कृतीत होळी व धुळवळीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रत्येक क्षणाला ...

फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी म्हणजेच आनंदाची पर्वणीच. हिंदू संस्कृतीत होळी व धुळवळीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रत्येक क्षणाला विशेषच महत्त्व असतेच.

पालांदूर येथे दुसऱ्या सत्रात गरदेव यात्रा मोठ्या उत्साहात म्हणता येणार नाही, परंतु पारंपरिक तेचा आधार घेत, वर्षातून एकदा येत असलेल्या गरदेव यात्रेत गावकऱ्यांनी हजेरी लावली होती. बाजारपेठही खूप मोठी फुलली नाही, १०० रुपये किलोने गाठी विकल्या गेली. डहाके वाद्य हे झाडीपट्टी संगीत साहित्यात सन्मानाचे वाद्य म्हणून प्रचलित आहे. जग कितीही प्रगतशील झाले, तरी जुन्या आठवणींना उजाळा दिल्यास निश्चितच जुने साहित्य, वाद्य संगीत, गाणे हुबेहूब मनाला आनंद देतात. असाच ग्रामीण वाद्यकलेचा वारसा ठरलेला डहाके वाद्य गरदेव यात्रेत आकर्षणाचा ठरला. गरदेव यात्रेत पुजारी मनोभावे खंडोबा देवाची पूजा करून पारंपरिक वाद्य डहाके वाजवीत लोकगीतांची झलकार सादर करून रोख बक्षीस मिळवितात. खंडोबा देवाचे नाव घेत, देणगीदात्यांचे नाव विविध अलंकारांनी सजवून त्यांचा सन्मान आपल्या झाडीपट्टी वाणीतून ध्वनिक्षेपकाचा आधाराने संपूर्ण गरदेव यात्रेत ऐकविला जातो.

पानपुडावर बहिष्कार

भजन संध्या कार्यक्रम आटपून गावकरी गावच्या मंदिरात, चावडीवर रात्रीच्या वेळी एकत्रित येतात. आपुलकीच्या भावनेने स्नेह वृद्धिंगत करीत पानपुडाचा कार्यक्रम सांभाळीत असत, परंतु कोरोनाचे संकट वाढल्याने पालांदूर परिसरातील बऱ्याच गावात पानपूड कार्यक्रम स्थगित करण्यात आला हे विशेष!