शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

गंगेकडे लक्ष, वैनगंगेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 1, 2014 22:48 IST

तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील चार ते पाच गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याची भिती बळावली आहे. आतापर्यंत नदीकाठावरील ४८ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे.

तुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील चार ते पाच गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याची भिती बळावली आहे. आतापर्यंत नदीकाठावरील ४८ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. तत्कालीन कृषीमंत्र्यांनी नदीकाठावर भेट देऊन पाहणी केली. परंतु पुढे काही झाले नाही. एकीकडे नदी बचाव आणि स्वच्छतेसाठी केंद्राने पुढाकार घेतला असताना इकडे मात्र वैनगंगा नदीची फरफट सुरू आहे. तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नदीचा प्रवास हा ४० ते ४५ कि.मी. इतका आहे. तालुक्यात लहान मोठे सहा नदीघाटांचे रेती लिलाव महसूल प्रशासन मागील अनेक वर्षापासून करीत आहेत. नियमबाह्य तथा अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने रेतीचा प्रचंड उपसा नदीपात्रात सातत्याने सुरु आहे. पर्यावरणतज्ज्ञ व स्थापत्य अभियंत्यांच्या निरीक्षणात प्रचंड रेती उपसाच नदीचा प्रवाह पात्र बदलते असे सांगत आहेत. तुमसर तालुक्यातील उमरवाडा, बोरी, कोष्टी, रेंगेपार व इतर नदीकाठावरील गावातील सुमारे ४८ हेक्टर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. उमरवाडा नदीपात्रात तर नदीपात्राच्या मधोमध मोठा खड्डाच पडला आहे. येथून रेतीचा उपसा किती झाला असेल ते दिसते. अशा मानवनिर्मित खड्यामुळे उमरवाडा येथील डोंगा उलटून डझनभर नागरिकांचा जीव एका वर्षापूर्वी गेला होता. सध्या नदीपात्रात रेती ऐवजी माती दिसत आहे. बाम्हणी येथे नदीघाटात माती व केवळ लहान दगडांचा खच नदीपात्रात दिसतो. माडगी, बाम्हणी, कोष्टी, बोरी, उमरवाडा, रेंगेपार ही गावे येणाऱ्या काळात नदीपात्रात गडप होण्याची भिती आहे. मागील वर्षी संभाव्य धोका टाळता यावा म्हणून तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा व परिसरातील नदीघाटांचा लिलाव करण्यात आला होता. तिरोडा तालुक्यात रेतीचे ढिगारे तयार झाल्याने नदीचे पाणी तुमसर तालुक्यातील गावाकडे वळते झाले होते. यावर्षी अदानी समूह, धापेवाडा सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा करण्यात आल्याने तथा तिरोडा तालुक्यातील नदीघाट लिलावाने काही प्रमाणात तुमसर तालुक्यातील नदी काठावरील शेती खचण्याला लगाम लागल्याचे दिसून आले. रेंगेपार येथेही यावर्षी अनेक आंदोलने झाली होती. परंतु निकाल अजूनपर्यंत लागला नाही. केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आले आहे.खासदार व आमदार एकाच पक्षाचे असल्याने आता अच्छे दिनाची प्रतीक्षा नदीकाठावरील ग्रामस्थांना आहे. केंद्र शासन गंगेकडे लक्ष देत असताना येथे वैनगंगेकडे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)