शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

जिल्हाधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी ‘गांधीगिरी’

By admin | Updated: November 1, 2014 22:47 IST

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा मुलमंत्र रामदास स्वामींनी दिला होता. त्यानुसार दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वत: ते कार्य करून दाखवावे, या ध्येयामुळे जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे

भंडारा : ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा मुलमंत्र रामदास स्वामींनी दिला होता. त्यानुसार दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वत: ते कार्य करून दाखवावे, या ध्येयामुळे जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी पालिका प्रशासनासह आज शनिवारला गांधी चौक परिसरात हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या. या मोहिमेत नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांच्यासह पालिका पदाधिकारी, नगरसेवक, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रामधुनपूर्वी गावपूर्ण ।व्हावे स्वच्छ सौंदर्यवान ।।कोणाही घरी गलीच्छपणं ।न दिसावे ।।काहिंनी सांडपाणी साचविले ।मच्छर जंतू अति वाढले ।।रोगराईने बेजार झाले । शेजारी सगळे ।।राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतील ओव्यांमधून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. मात्र, राष्ट्रसंतांनी दिलेल्या संदेशाला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही संकल्पना साकारण्यासाठी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला होता. त्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान शासकीय, निमशासकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्थेत राबविण्यात येत आहे. भंडारा नगरपालिका प्रशासनाने या स्वच्छतेच्या या हाकेला साद देत शहरातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. या अभियानात जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना उपदेश देण्याऐवजी स्वत: हातात झाडू घेऊन शहरातील सफाई अभियानात सहभाग घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सफाई करण्यास सुरूवात करताच उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, पालिका मुख्याधिकारी रविंद्र देवतळे, उपाध्यक्ष कविता भोंगाडे, सभापती नितीन गायधने, सभापती शमिन शेख, नगरसेवक महेंद्र गडकरी, नगरसेवक अ‍ॅड. विनय पशिने, मिलींद मदनकर, हिवराज उके, माधुरी चौधरी, हाजी अखरी बेगम, महेंद्र निंबार्ते, मधुरा मदनकर यांच्यासह पालिकेचे अभियंता, कर्मचारी व सर्व कामगार व परिसरातील नागरिकांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. नियमित कामगारांखेरीज शहराची स्वच्छता करण्यासाठी ३० अतिरिक्त कामगार कामावर लावले आहे. दररोज दोन प्रभागाची स्वच्छता करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वांनी चार तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. यावेळी सर्वांनी मार्ग स्वच्छ करण्यासोबतच नाल्यांची सफाई करून झाडेझुडपे तोडून परिसर स्वच्छ करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)