शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अंत्यसंस्कारासाठी गेलेल्यांवर पुन्हा मधमाशांचा हल्ला, महिनाभरातील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:27 IST

मृतदेह सोडून लोकांनी काढला पळ

मोहाडी (भंडारा) : हरदोली झंझाड येथील गावात अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला. लोकांना मृतदेह सोडून जिवाच्या भीतीने बाहेर पळावे लागले. ही घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे जिल्ह्यात महिनाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे.

हरदोली झंझाड गावातील मोराती कबल गायधने यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकरी आणि मित्र परिवार आला होता. हरदोली येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावाजवळील स्मशानभूमीत अंत्ययात्रा नेण्यात आली. अंत्यसंस्काराचा विधी सुरू झाला. सर्वजण शोकाकुल वातावरणात या विधीत सामील झाले होते. विधीनंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे धूर निर्माण झाला. इतक्यात अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होताच अंत्ययात्रेला आलेले लोक भयभीत झाले आणि वाट मिळेल तिकडे पळायला लागले.

मृतदेह स्मशानभूमीतच सोडून सर्वजण पळाले. लोक सैरावैरा धावत होते. कुणी शेतात पळाले, तर कुणी गावाच्या दिशेने धावत होते. कुणी पाण्याच्या दिशेने पळाले. जीव वाचवण्यासाठी लोक नुसते धावत होते. अवघ्या मिनिटभरात स्मशानभूमीत शुकशुकाट पसरला. या धावपळीत अनेकजण पडले. मधमाशांचा हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली.

अखेर पोळ काढला

मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी पुढे असा धोका टाळण्यासाठी तो पोळ गावातील व्यक्तींकडून काढून घेतला.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा