शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

अंत्यसंस्कारासाठी गेलेल्यांवर पुन्हा मधमाशांचा हल्ला, महिनाभरातील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:27 IST

मृतदेह सोडून लोकांनी काढला पळ

मोहाडी (भंडारा) : हरदोली झंझाड येथील गावात अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला. लोकांना मृतदेह सोडून जिवाच्या भीतीने बाहेर पळावे लागले. ही घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे जिल्ह्यात महिनाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे.

हरदोली झंझाड गावातील मोराती कबल गायधने यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकरी आणि मित्र परिवार आला होता. हरदोली येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावाजवळील स्मशानभूमीत अंत्ययात्रा नेण्यात आली. अंत्यसंस्काराचा विधी सुरू झाला. सर्वजण शोकाकुल वातावरणात या विधीत सामील झाले होते. विधीनंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे धूर निर्माण झाला. इतक्यात अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होताच अंत्ययात्रेला आलेले लोक भयभीत झाले आणि वाट मिळेल तिकडे पळायला लागले.

मृतदेह स्मशानभूमीतच सोडून सर्वजण पळाले. लोक सैरावैरा धावत होते. कुणी शेतात पळाले, तर कुणी गावाच्या दिशेने धावत होते. कुणी पाण्याच्या दिशेने पळाले. जीव वाचवण्यासाठी लोक नुसते धावत होते. अवघ्या मिनिटभरात स्मशानभूमीत शुकशुकाट पसरला. या धावपळीत अनेकजण पडले. मधमाशांचा हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली.

अखेर पोळ काढला

मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी पुढे असा धोका टाळण्यासाठी तो पोळ गावातील व्यक्तींकडून काढून घेतला.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा