शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

चार वर्षांत २३६ शेतकऱ्यांना मिळाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:29 IST

भंडारा : शेतात काम करताना विविध अपघाताने शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे ...

भंडारा : शेतात काम करताना विविध अपघाताने शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. भंडारा जिल्ह्यात गत चार वर्षांत जिल्ह्यातील २३६ शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यासाठी गेल्या चार वर्षांत ३६१ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले होते.

घरातील कर्त्या व्यक्तीचा तसेच शेतकरी कुटुंबातील इतर सदस्य झालेला मृत्यू तसेच अपघातामध्ये कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन घरात हलाखीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबास अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांची भरपाई तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपयांची भरपाई, अपघातामध्ये एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची भरपाई तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाईचा लाभ देण्यात येतो. आर्थिक लाभ देण्याकरिता सर्व वहितीधारक खातेदार व शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य आई-वडील शेतकऱ्याची पत्नी, पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे १० ते ७५ वयोगटातील एकूण दोनजणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ हा कृषी विभागामार्फत दिला जातो. यासाठी जिल्ह्यातील एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

बॉक्स

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात

रस्ता, रेल्वेचा अपघात, पाण्यात बुडून होणारे मृत्यू, अपघाती विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरून पडून होणारा मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात होणारा मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या यासारख्या कारणांनी होणारे मृत्यू अथवा अपघात झाल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.

बॉक्स

दाव्यासाठी लागणारी कागदपत्रे

तालुका कृषी अधिकारी पत्र, तारखेसहित संपूर्ण दावा अर्ज, वारसदारांच्या मोबाईल नंबरसहित भरलेला अर्ज, वारसदाराचे राष्ट्रीयीकृत बँकखाते, वयाचा दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, सात-बारा, सहा ड, मृत्यू प्रमाणपत्र, घटनास्थळाचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, अपंगत्वाचा दाखला, औषधोपचाराचे कागदपत्र, अपघात नोंदणी ४५ दिवसांच्या आत करावी, अशा कागदपत्रांचा समावेश यात आहे.

बॉक्स

वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसल्यास दाव्यासाठी लागणारी कागदपत्रे

ज्या शेतकऱ्यांची वहितीखातेधारक म्हणून नोंद आहे, त्यांचा वारस म्हणून प्रस्ताव सादर करतो आहे. त्या शेतकऱ्याच्या सात-बारा, उतारा, सहा ड, शासन निर्णयानुसार अपघातासंबंधी लागणारी सर्व कागदपत्रे, रेशनकार्ड, वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांशी नाते स्पष्ट करणारे पुरावे असणे गरजेचे आहे.

कोट

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वारसदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घ्यावी.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा

चार्ट

मिळालेले एकूण लाभ एकूण अर्ज

2016 17 57 लाभ अपात्र 40

17 2017 72 लाभ अपात्र 57

2018 19 ५५ लाभ अपात्र 13

19 20 लाभ 84 अपात्र 27