लाभासाठी निराधारांची पायपीट
By Admin | Updated: April 24, 2017 00:58 IST2017-04-24T00:58:10+5:302017-04-24T00:58:10+5:30
पवनी तालुक्यात हजारो लाभार्थी शासनाच्या निराधारासाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत.

लाभासाठी निराधारांची पायपीट
सर्व काही मानधनासाठी : आधारकार्डच्या लिंकिंगमुळे बोगस लाभार्थ्यांची पोलखोल
चिचाळ : पवनी तालुक्यात हजारो लाभार्थी शासनाच्या निराधारासाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत. परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या चार- पाच महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांना तहसिल कार्यालय तसेच बँकेत चकरा मारुन थकले असल्याने हजारो लाभार्थी चालकासारखी मानधनाची वाट पाहत आहेत. शासनाने निराधाराची होत असलेली पिळवणूक त्वरित थांबवावी अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समाजातील निराधार वृध्दासाठी श्रावणबाळ योजना तर परितक्ता विधवा अपंग दुर्धर आजारी वैगेरे स्त्री-पुरुषासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यात श्रावणबाळ व संजय गांधी या योजना राज्यशासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या केंद्र सरकारच्या आहेत. दोन्ही सरकारच्या मिळून या चारही योजनेचे अनुदान न मिळाल्याने रोज बँकेत व तहसिल कार्यालयात चकरा मारुन थकले आहेत.
शेकडो लाभार्थ्यांनी अनेकदा तक्रारी प्रतिनिधीकडे मांडतात केंद्र व राज्य शासनाने सर्व योजनासाठी आॅनलाईन प्रणाली लागू केली असून तयात वारवार होणाऱ्या बिघाडामुळे तालुक्यात शेकडो लोकांना अनुदान न मिळाल्यान ते त्रस्त आहेत.
सर्व लाभार्थ्यांना डाटा अपडेट करणे सुरु असुन अनेकवेळा मागणी करुन सुध्दा शेकडो लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड सादर न केल्यामुळे तसेच शासनाने प्रत्येक योजनेसाठी आधारकार्ड आवश्यक केल्यामुळे आधारकार्ड सादर न केल्यास लाभार्थ्यांच्या खाते क्रमांक आधार कार्डसोबत लिंक झाली नाही तर अनेक लोकांकडे आदेशपत्र नाही त्यामुळे सदर व्यक्ती कोणत्याच योजनाचा लाभ घेतो हे कळत नाही. तसेच शेकडो जणांनी पती-पत्नी, मुलगा आई सासु सासरे संयुक्त खाते पुस्तक क्रमांक दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार फक्त अठरा वर्षाखालील निराधारासाठी संयुक्त खातेपुस्तक चालते इतरांसाठी नाही. त्याशिवाय एकच व्यक्ती दोन योजनांचा लाभार्थी लाभ घेत असल्याची बाब सुध्दा आधारकार्डमुळे उघडकीला येत असतात.
अनुदानाची चौकशी करणाऱ्या व्यकत्ीने सोबत आदेशपत्र आधारकार्ड व नोंदणी केलेले खातेपुस्तक आणावे अशा सुचना देऊनसुध्दा लोक केवळ खाते पुस्तक घेवून येतात नविन लाभार्थ्यानी जे खाते पुस्तक दिले. त्यावर अनुदान पाठविले असता सदर खाते पुस्तक बंद असल्यामुळे अनुदान परत येते म्हणून नविन लाभार्थ्यांची सुरु असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचाच खाते क्रमांक घ्यावा असे आवाहन करण्यात येतात. जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देताना या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत असून लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य केल्यास लवकरच सर्व तक्रारी दूर होवून पात्र लाभार्थ्यांना नियमित अनुदान मिळेल, असे सांगण्यात येते. (वार्ताहर)
पोस्टातच मानधन द्या
ग्रामीण लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या डाक कार्यालयातून वृध्दांना मानधन मिळत आहे. त्यामुळे त्यांना १० ते १५ किमी हा त्रास होत नाही. मात्र आता त्या वृध्दांना तुमचे खाती राष्ट्रीय बँकेला जोडण्याचे संबंधीताकडून बोलले जात असल्याने ग्रामीण वृध्दांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ते मानधन पोस्टातूनच देण्यात यावे अशी मागणी होत आहे.