अन्नसुरक्षा योजनेतून गरजूंना अन्नधान्य
By Admin | Updated: June 26, 2017 00:29 IST2017-06-26T00:29:10+5:302017-06-26T00:29:10+5:30
शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली.

अन्नसुरक्षा योजनेतून गरजूंना अन्नधान्य
चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : देऊळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाच्या "सबका साथ सबका विकास" या संकल्पनेच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजना सुरु करुन समाजातील गरजू घटकांना अन्नधान्य मिळण्यास सुरवात झाली. वंचित राहिलेल्या अत्यंत गरजवंताना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन नव्याने पाच हजार कार्ड तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिली, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील देऊळगाव येथे ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पण, स्मशानभूमीचे भूमीपूजन व वनव्यवस्थापन समितीद्वारे महिला गॅस कनेक्शनचे वाटप अशा विविधांगी कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्य चंदु पिल्लारे, पंचायत समिती सदस्य जगदीश उके, प्रमेश नलगोपुलवार, तालुका युवा मार्चाचे अध्यक्ष अंकुश समरीत, श्रीकृष्ण जावळकर, सरपंचा प्रिया राहुल, उपसरपंच किशारे मोहनकर, युवा नेते रक्षीत उचिबगले, वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले, क्षेत्रसहाय्यक बावनथळे, वनरक्षक मोहन गटारे, अनिल झंझाड, हाके, सेवक पिल्लारे, माजी सरपंच अंबादास उचिबगले, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मेश्राम व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार वाघमारे म्हणाले, पुर्वी शासन व्यवस्थेत अनियमितता असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वंचीत राहावे लागत होते. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर गरजवंताना त्यांचा फायदा होणार आहे. त्याकरीता अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातुन शासनाने गरजवंताच्या दारापर्यंत अन्न धान्य पोहचविण्याचे प्रभावी कार्य केल्यामुळेच आज कुणीही उपाशी राहणार नाही. याची काळजी शासनाने घेतली आहे.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पन करण्यात आले. यानंतर रोहयो अंतर्गंत येथील स्मशानभूमी भूमीपूजन व आमदार चरण वाघमारे यांच्या स्थानिक निधी अंतर्गंत बांधलेल्या ग्रामपंचायत भवन व सभामंडपाचे लोकार्पन व महिलांना गॅस कनेक्सनचे वितरण आ. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. इंधनासाठी महीलांनी वृक्षतोड न करता गॅसचा नियमित वापर करुन कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कांद्रीचे वनपरिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले यांनी केले. संचालन उपसरपंच किशोर मोहनकर यांनी तर, आभार रक्षीत उचीबगले यांनी मानले.