शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

पूराचा फटका; पिकांसाठी ९६.९३ लाख रुपयांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:15 IST

चुलबंद, वैनगंगा नदीचा प्रकोप : शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सन २०२३च्या खरीप हंगामात चूलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठावरील गावांतील हजारो हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानप्रकरणी शासन निर्देशानुसार क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती. या मागणीनुसार मागील वर्षी पुराच्या पाण्याने झालेल्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून ९६.९३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मंजूर निधीअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाचे आवाहन स्थानिक महसूल प्रशासन अंतर्गत करण्यात आले आहे.

माहितीनुसार, मागील खरीप हंगामाच्या सुमारास जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी तालुक्यातील अंतरगाव, असोला, आथली, आवळी, चप्राड, डांबेविरली, गवराळा, विरली खुर्द, इटान कन्हाळगाव, केशोरी (खा), केशोरी (रयत), खैरी पट, किन्हाळा, लाखांदूर, मडेघाट, मेंढा, मोहरणा, नांदेड, सोनी, टेंभरी व विहीरगाव आदी २१ गावांतील शेतात शिरले होते.

या पुराच्या पाण्याने या गावांतील हजारो हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शासन निर्देशानुसार स्थानिक लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांच्या ई-पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करून शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती.

१ हजार ४८९ शेतकऱ्यांना फटकानदीला आलेले पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिकांच्या नुकसानप्रकरणी ई-पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली होती. या कार्यवाही अंतर्गत तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीकाठावरील तब्बल २१ गावांतील १ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या विविध खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला आहे.

पवनी तालुक्यात मदतीपासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील शेतीचे व ज्या ठिकाणी पुराचे पाणी गेले, त्या ठिकाणची शेती पूर्णपणे नष्ट झाली. त्या संबंधाने शासनाने मागील वर्षी अशा पूरपीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांची यादी बनवली. मागील वर्षी बनवलेली यादी यावर्षी प्रकाशित करण्यात आली; परंतु या यादीमध्ये कित्येक जणांची नावे समाविष्ट नाहीत. ते पूरपीडित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

पवनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची नावे सुटलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले व पुराचे पाणी शेतामध्ये शिरले होते. अशाअसाच प्रकार गावागावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नदीकाठच्या असंख्य गावांमध्ये पुरामुळे बुडलेल्या शेतीचे सर्वेक्षण बरोबर करण्यात आले नसल्याचे दिसून येते.

एकदा यादी बनल्यानंतर या यादीतून इतर नावे का गाळली जातात, यावर मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण बरोबर केले नसल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या शेतकऱ्यांची मागील वर्षाच्या पूरबुडीच्या यादीत नावे नाहीत त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, त्वरित यादी बनवण्यात यावी, अशी मागणी पूरपीडित शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीbhandara-acभंडारा