शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.

ठळक मुद्देजलाशय तुडूंब : अवकाळीचा शेतीला फटका, मात्र सिंचन प्रकल्पाच्या साठ्यात वाढ

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी नुकसानीचा ठरत असला तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पासाठी संजीवनी ठरत आहे. नव्या वर्षात १ जानेवारीपासून पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. सदर जलाशय तुडूंब भरल्याने परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.१ जानेवारीपासून प्रकल्प स्थळातील पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. अवकाळी पावसाने हा जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. जलाशय तुडूंब भरत असताना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पर्यटकांना वाहन प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असले तरी जलपातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहे.जलसाठ्याचे नियोजन गरजेचेउन्हाळ्यात पाणीटंचाईचे चित्र राहत असल्याने जलाशयातील पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी अवकाळी पावसाने प्रकल्पाला नवसंजीवनी दिली आहे. बावनथडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत दोन महिने नदीपात्रात पाणी होते, परंतु विजेचे ब्रेकडाऊन असल्याने पंपगृह सुरु करण्यात आले नव्हते. १ जानेवारीपासून प्रकल्पस्थळात पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. ३६ फुट पाणी साठवण करण्याची क्षमता असणाºया चांदपूर जलाशयात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असण्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात