शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

'या' गावात रहस्यमय आगीचे थैमान, ४० वर्षांपासून सुरू आहे 'हा' प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 3:12 PM

गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते. परंतु, गुरुवारी दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली.

ठळक मुद्देधानाचे पुंजने जळाले : शेतकरी भयभीत

भंडारा : तुमसर तालुक्यातील हरदोली गावात रहस्यमय आगीने थैमान घातले असून गत ४० वर्षांपासून आगीचा प्रकार सुरू आहे. गुरुवारी शंकर बिसने यांच्या शेतातील धानाचे पुंजने जळाले आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हरदोली गावात रहस्यमय आगीचा अनुभव गावकरी घेत आहेत. या गावात घरांना आग लागणे, घरातील कपडे जळाल्याचे प्रकार घडले आहेत. घरावर दगड कोसळल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय लगत असणाऱ्या कर्कापूर गावांतही रहस्यमय आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अद्याप कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

गावकऱ्यांनी रहस्यमय आगीच्या घटनेवर अंकुश घालण्याचे प्रयत्न केले आहेत. यात त्यांना यश आले नाही. अनेक वर्षांपासून गावकरी व शेतकरी नुकसान सोसत आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी व घरमालकांना कधी शासन स्तरावरून भरीव आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे शासनाकडून गावकऱ्यांनी आर्थिक मदतीची अपेक्षा सोडली आहे. गावात फक्त नुकसान सोसल्याशिवाय गावकऱ्यांना गत्यंतर नाही. मात्र, गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी बेफिकीर झाले होते व रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते.

दोन वर्षांच्या कालावधीत घर व धानाच्या पुंजन्यांना आग लागली नसल्याने गावकरी बिनधास्त होते. परंतु गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतकरी शंकर बिसने यांच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली. आग विझविण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पुंजन्याला अचानक आग लागल्याने धानाची राख झाली आहे. आग लागल्याची चर्चा गावांत पसरताच नागरिक व शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. गावात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर अंकुश घालण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

गत ४० वर्षांपासून गावांत रहस्यमय आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या २ वर्षात या घटना थांबल्या होत्या. परंतु, गुरुवारी दुपारी पुन्हा एका शेतकऱ्याचे धानाचे पुंजने जळाल्याने भीती निर्माण झाली आहे.

- नितीन गणवीर, सरपंच, हरदोली

या गावात आगीच्या घटनांत नुकसान झाल्याचा अनुभव गावकरी व शेतकऱ्यांना आहे. अनेक वर्षांपासून असे प्रकार सुरू असून नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत घोषित झाली पाहिजे. या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.

सतीश सोनेवाने, सामाजिक कार्यकर्ते, पांजरा

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीagricultureशेती