अखेर गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता चार दिवसात झाला तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:47+5:30
गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

अखेर गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता चार दिवसात झाला तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने गणेशपूर स्मशानभूमी रस्ता पाण्याखाली आला होता. अंत्यसंस्कारासाठी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर गोसे पुनर्वसन विभागाने याची दखल घेतली आणि चार दिवसात हा रस्ता तयार करण्यात आला. यामुळे गणेशपुरच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सदर काम तात्काळ केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला. त्यासाठीच १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. याची दखल घेत गोसे पुनर्वसन विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.
गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता अवघ्या चार दिवसात तयार करण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
समस्या मार्गी
गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने शेतशिवाराचे रस्ते बंद झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत गोसे प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढून नवीन रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.