नदीकाठावरील शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:01:11+5:30

जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्याखाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची शेती वैनगंगा नदीपात्रात सामावली आहे.

Farming crisis on the banks of the river | नदीकाठावरील शेती संकटात

नदीकाठावरील शेती संकटात

ठळक मुद्देबावनथडी व वैनगंगा नदी : जिल्हा प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी आणि वैनंगगा नदीकाठावरील हजारो शेतकºयांची बागायती शेती संकटात आली आहे.
जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्याखाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची शेती वैनगंगा नदीपात्रात सामावली आहे. याचा फटका अल्पभूधारक शेतकºयांना बसत असून वैनगंगा नदीकाठावर गावे असणाºया शेतकºयांवर नवीन संकटे येत आहेत. अनेक शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या होत्या. शेतकºयांच्या सातबारावर कर्जाची नोंद असताना नदीकाठावरील शेती आणि त्याला लागून असणाºया विहिरीसुध्दा पाण्याखाली गेल्या आहेत. नदीपात्राच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे तालुक्यासाठी वरदान ठरणाºया नद्या शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरु पाहत आहेत.
तुमसर तालुक्यातील अडीच हजार लोकवस्तीच्या बपेरा गावात बहुतांश शेतकरी आहेत. बावनथडी नदीकाठावर शेतकºयांची बागायती शेती आहे. या शेतकºयांसाठी नदीचे वाढते पात्र कर्दनकाळ ठरत आहे. बावनथडी नदीच्या पात्राने मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सिमाभागांची विभागणी केली आहे. आधी नाला स्वरुपात असलेल्या नदी पात्राने आता विशाल रुप धारण केले आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेने दिवसेंदिवस वाढत आहे.
बावनथडी नदीच्या वाढत्या पात्रात बपेरा गावातील शेतकºयांची ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. यामध्ये २० हून अधिक विंधन विहिरी भुईसपाट झाल्या आहेत. नदीकाठावरुन विहिरीचे अवशेष आजही साक्ष देत आहेत. गावातील शेतकºयांवर वाढत्या पात्राने मोठे संकट ओढावले आहे.
नदीपात्राजवळील शेती पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी शेतमजूर झाले आहेत तर अनेकांना भुमिहीन होण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाल्याने काहीजणांनी गावही सोडले आहे. वडिलोपार्जित शेती नदीपात्रात गेल्याचे दु:ख गावातील शेतकºयांच्या चेहºयावर दिसून येत आहे. मात्र शासनाकडून हे शेतकरी कायमच दुर्लक्षित राहिले आहेत.
नदीपात्रात शेती गेल्याच्या समस्येमुळे बपेरा, चुल्हाड, सुकळी, वांगी, परसवाडा, तामसवाडी, पांजरा, नवरगाव, बोरी, उमरवाडा, चारगाव आदी गावातील शेतकरी भूमिहीन झाल्याने शासनाने यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे.

रोजगारासाठी शहराकडे पलायन
नदीकाठावरील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी रोजगारासाठी शहराकडे पलायन करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख वैनगंगा व बावनथडी नदी काठावरील शेतकºयांची शेती पाण्याखाली राहत असल्याने त्यांना उत्पादन मिळत नाही. याविषयी प्रशासनाला माहिती असतानाही नदी काठावरील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी संकटात आहेत.

Web Title: Farming crisis on the banks of the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती