धान्य विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:29+5:302021-02-05T08:40:29+5:30

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची ...

Farmers will no longer have to work hard to sell grain | धान्य विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही

धान्य विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची समस्या ही मी अनेक दिवसांपासून स्वतः जाणून होतो. त्यामुळे प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी वारंवार पाठपुरावा केल्याने आज खऱ्या अर्थाने बळीराजाचे धान्य खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

तालुक्यातील खरबी नाका येथे धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य नीता आकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, खरबीचे उपसरपंच संजय आकरे, ठाण्याच्या सरपंच सुषमा पवार, परसोडीच्या सरपंच कल्पना मोटघरे, ठाण्याच्या माजी सरपंच कल्पना निमकर, साहुलीच्या सरपंच संगीता हटवार, खराडीच्या सरपंच माया हिवसे, शहापूरचे माजी सरपंच दादा सेलोकर, बालाजी वाघमारे, सुभाष वाडीभस्मे, भाऊराव गिरीपुंजे, दूर्वास आकरे, दीपाली आकरे, संस्था सचिव शालिनी गिरिपुंजे, सीमा मोथरकर, चिखलीच्या सरपंच रंजना वाघमारे, अशोक आकरे, चंद्रशेखर गिरडे, गजू बावनकुळे, भगवान लांडगे, नाना बावनकुळे, विजय हटवार, प्रमोद भस्मे यांच्यासह आदर्श सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मोथरकर, अध्यक्ष सुनील गिरिपुंजे, वाल्मीक मोथरकर, विकी गिरिपुंजे, दिनेश भस्मे, रामा आकरे, रणजित गिरिपुंजे, संस्थेचे ग्रेडर सुखमनी साकोरे, श्रीकृष्ण वैद्य, शैलेश मोथरकर, नीलेश मोथरकर, शिवा गिरिपुंजे, योगेश निमकर उपस्थित होते. यावेळी आ. भोंडेकर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून संस्थेचे पदाधिकारी सुनील गिरिपुंजे, उपसरपंच संजय आकरे, गणेश मतकर यांनी परिसरातील शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी संस्थेअंतर्गत धान्य विक्रीसाठी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केल्यानेच खरबी येथे केंद्र मंजूर झाले, त्यामुळे आज बळीराजाचा संघर्ष थोड्याफार प्रमाणात कमी करता आल्याने आज मला समाधान होत आहे.

आता पाण्यासाठी पुढाकार

खरबीचे उपसरपंच संजय आकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी तब्बल ३० ते ४०, प्रसंगी ५० किलोमीटर अंतरावर धान विक्रीसाठी जावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांचा संघर्ष संपला आहे. आता पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांना हक्काचे पाणी आणि कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Farmers will no longer have to work hard to sell grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.