शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

शेतकऱ्यांचा कल घरचे बियाणे वापरण्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:24 AM

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा २ लाख ...

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. त्यासाठी ५१ हजार ३२० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. महाबीज आणि खासगी कंपन्यांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु अर्धा मृग नक्षत्र संपला तरी अद्यापही कृषी केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी दिसत नाही. यावर्षी कोरोना संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. खरीप हंगामात विकलेल्या धानाचे हमीभावानुसार मिळालेले पैसे गरजेसाठी वापरण्यात आले. बोनस मिळेल आणि त्यातून बियाण्यांची खरेदी करू असे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. परंतु अद्यापपर्यंतही बोनसचे पैसे मिळाले नाही. कधी मिळणार याबाबतही अनिश्चितता आहे. शेतीची मशागत झाली. हातात पैसा नाही. अशा स्थितीत संकरीत बियाणे विकत घेऊन पेरण्यापेक्षा घरचेच बियाणे पेरण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

अनेक शेतकरी घरचे बियाणे पेरण्याच्या तयारीत असल्याने कृषी विभागही त्यांच्या मदतीला धावून आला आहे. बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन केले जात आहे. बियाण्यांबाबत परावलंबित्व टाळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाहीत ते एकमेकांकडून घेऊन पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीसाठी एकरी सहा किलो बियाण्यांची गरज असते. सध्या शेतात साफसफाईची कामे सुरू असून नर्सरी टाकण्याची पूर्व तयारी सुरू आहे. दमदार पाऊस पडल्यानंतर कोरडवाहू शेती असणारे शेतकरी पऱ्हे टाकण्याला सुरुवात करतील. तर ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकणीला सुरुवात केली आहे.

बाॅक्स

संकरीत बियाण्यांच्या किमतीत वाढ

धानाच्या संकरीत वाणाच्या विविध प्रजाती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक कंपन्यांनी गावागावांत मोर्चेबांधणीही केली आहे. यंदा बियाण्यांच्या किमतीत जवळपास २० टक्केने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. साधारणत: संकरीत बियाण्यांची एक किलोची बॅग ३५० रुपयाला बाजारात उपलब्ध आहे. परंतु आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांकडेच पाठ फिरविली आहे.

बाॅक्स

घरच्या बियाण्यांचे उत्पन्न १५ ते १८ क्विंटल

गत काही वर्षांपासून अर्ली व्हेरायटीच्या नावाखाली शेतकरी संकरीत वाणाची पेरणी करीत आहे. जिल्ह्यात एकरी २५ ते ३० क्विंटल संकरीत वाणाच्या बियाण्यांचे उत्पन्न होते. मात्र त्यासाठी मोठा खर्चही करावा लागतो. दुसरीकडे साधे किंवा घरचे बियाणे वापरले तर १५ ते १८ क्विंटल उत्पन्न येत असल्याचे जाणकार शेतकरी सांगतात.