वसुलीच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: January 7, 2015 22:48 IST2015-01-07T22:48:22+5:302015-01-07T22:48:22+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात खाजगी पतसंस्थानी वसूलीचा तगादा सुरू केला आहे. ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे.

वसुलीच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त
पालोरा (चौ.) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात खाजगी पतसंस्थानी वसूलीचा तगादा सुरू केला आहे. ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता बळावली आहे.
देशाची अर्थ संकल्पना ही शेतीवर आधारित आहे. यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पडल्यामुळे परिसरातील बहुतांश धानपिकाला फटका बसला. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. २५ टक्के कोरडवाहू धान रोवणी झाली. मात्र अखेरच्या पाण्याने हुलकावणी दिल्यामुळे हातात काहीच आले नाही.
एकीकडे परिस्थिती दुष्काळाची आणि दुसरीकडे पतसंस्थाकडून वसूलीचा तगादा असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. आता याच आठवड्यात तालुक्यातील कुर्झा येथील शेतकऱ्यांने कर्जापोटी आत्महत्या केली.
दरवर्षी वाढणारा कर्जाचे डोंगर बँकेतील पतसंस्थातील कर्जाचा वाढता व्याजाचा दर यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. (वार्ताहर)