वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:20+5:302021-07-20T04:24:20+5:30
बॉक्स डिझेलच्या दरवाढीने इंजिन परवडत नाही नियमितपणे वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून ...

वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त
बॉक्स
डिझेलच्या दरवाढीने इंजिन परवडत नाही
नियमितपणे वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून त्यावर रोवणी करायचे म्हटले तरी डिझेलचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना इंजिनवर धान रोहिणी करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करता चोवीस तास वीजपुरवठा सुरळीत करावा अशीच मागणी सध्या होत आहे.
बॉक्स
नागपूरला दिवसभर वीज मिळते भंडाराला का नाही
भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी, चिखली परिसरालगत नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दिवस दिवसभर वीज जात नाही. मात्र, शेजारीच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गावात मात्र विजेचे असलेले भारनियमन पाहता शेतकरी हवालदिल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळत आहे तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने हा अन्याय आमच्यावर का, असा सूर शेतकऱ्यांतून उमटत आहे. एकीकडे वीजवितरणाच्या धोरणाने शेतकरी हतबल झाला आहे तर दुसरीकडे आता शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यावर लोकप्रतिनिधींनीच तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
कोट
आमच्या गावालगत नागपूर जिल्ह्यातील शेतशिवारात चोवीस तास वीज राहते तर मग भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर का अन्याय केला जात आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाची सोय असतानाही शेतकऱ्यांना वेळेवर रोवणी करता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करावे लागेल.
संजय आकरे,
उपसरपंच, खरबी नाका