शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती मजबूत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:28 AM

आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.

ऑनलाईन लोकमततुमसर : आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.पंचायत समिती तुमसरच्या वतीने तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी व गौपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माडगी येथे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, शुभांगी राहांगडाले, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, पं.स. सदस्य कनपटे, पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चोपकर आदी उपस्थित होते.यावेळी नागपूरे यांनी, धानाची शेती करून शेतकरी स्पर्धेच्या युगात कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे लग्न व आवश्यक गरजा कधीही पूर्ण करू शकत नाही. निसर्गामुळे व शासनाच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे न्याय मिळणे अशक्य आहे. धानाची शेती परवडत नाही म्हणून शेतात ऊस लावले. पण कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. दुधापेक्षा बंद बॉटलचे पाणी महाग आहे. शासनाने दुधाचे भाव कमी करून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. परदेशात शेतकऱ्यांकडून दूध खरेदीवर सरकार आधारमूल्यापेक्षा दर लिटर पाच रुपये अतिरिक्त भाव देते. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी चार रुपये अतिरिक्त भाव द्यावा अशी मागणी हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.