शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भेल प्रकल्पाच्या रखडलेल्या भविष्यावर शेतकऱ्यांचा 'नांगरणी' हल्ला: प्रशासन हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:27 IST

भेलच्या हस्तांतरित शेतजमिनीवर ट्रॅक्टर : जमिनी घेतल्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली (भंडारा) : गत १२ वर्षापासून रखडलेला भेल प्रकल्प सुरू होत नाही आणि शेतकऱ्यांना जमिनीही परत दिल्या जात नाहीत. अशा स्थितीत अखेर सोमवारी भाजपचे विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात या अधिग्रहित शेतजमिनीवर दहा ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांनी नांगरणी केली आणि पन्हे भरले. सत्ताधारी आमदारांच्याच या 'जबरन जोत'मुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. 

आमच्या शेतजमिनी आम्ही परत घेतल्या. भेल प्रकल्प जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही या जमिनी प्रकल्पाला परत देऊ, अन्यथा आमच्या नावे असलेल्या सातबाराच्या शेतीवर आम्ही यापुढे शेती करणार, अशी भूमिका भेल प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने घेतली आहे. ९ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मुंडीपार येथील प्रकल्पस्थळी सोमवारी परिसरातील मुंडीपार, खैरी आणि ब्राह्मणी या गावांमधील शेकडो शेतकरी उपस्थित झाले होते. डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात थेट ट्रॅक्टर चालवून शेतजमिनीवर नांगरटी केली. एवढेच नाही तर भेल प्रकल्पाचे बंद गेट उघडून आत प्रवेश केला. अडीच तास चाललेल्या या अनोख्या कृती आंदोलनामुळे प्रशासन व भेल व्यवस्थापन पुरते हादरले आहे. 

फुके हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना त्यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे महायुती सरकारला घरचा आहेर असल्याचे समजले जात आहे. या आंदोलनात भेल संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय नवखरे, बामणीचे सरपंच मुकेश मॅनपाले, उपसरपंच हरिभाऊ वरखडे, मुंडीपारचे उपसरपंच हरीश लांडगे, माजी नगरसेवक मनीष कापगते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत शेती करूया संदर्भात प्रतिक्रिया देताना भेल प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष विजय नवखरे म्हणाले, भेल प्रकल्प सुरू होऊन परिसरात बेरोजगारीचा प्रश्न सुटेल अशा आशेवर आम्ही सारे होतो. या प्रकल्पाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या जमिनी ताब्यात घेऊन शेती करतील.

"भेल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यासंदर्भात प्रशासनाकडे अद्याप कसलाही पत्रव्यवहार सरकारकडून अथवा एमआयडीसी झालेला नाही. एमआयडीसीचा भेल हा परवानाधारक आहे. त्यामुळे या संदर्भात एमआयडीसीकडून आक्षेप नोंदविल्यावर कारवाई केली जाईल."- डॉ. संजय कोलते, जिल्हाधिकारी, भंडारा.

"मागील बारा वर्षांपासून हा प्रकल्प सुरू झालेला नाही. भेलने केवळ या जमिनी स्वतःकडे हस्तांतरित केल्या आहेत, शेतकऱ्यांनी कंपनीकडे जमिनीची विक्री केलेली नाही. अद्यापही या जमिनीचा सातबारा शेतकऱ्यांच्याच नावे आहे. आमचा लढा हा सरकारशी नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कंपनी विरोधात आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची संघटना आणि आपण मिळून हा निर्णय घेतला आहे."- डॉ. परिणय फुके, विधान परिषद सदस्य.

टॅग्स :bhandara-acभंडाराParinay Fukeपरिणय फुके