शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 21:59 IST

अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी १४०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करीत आहेत. प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या पावसाचे संकट झेलत शेतकऱ्यांचा धान घरात आला. दिवाळीपूर्वी आधारभूत केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, आता केंद्र सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी दिवाळी सण साजरा करण्यासाठी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. प्रतिक्विंटल ६०० रुपयांचा फटका सहन करीत आहेत.भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात आली होती. तीनदा झालेली अतिवृष्टी आणि सतत सुरु असलेल्या पावसाने धानाचे मोठे नुकसान झाले. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिंमत न हारता धानाची कापणी सुरू केली. बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हलक्या प्रतीचा धान घरी आला आहे. मात्र, तो विकावा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू झाले की शेतकरी आपला धान पणन महासंघाला देतात. परंतु यावर्षी अद्यापही ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. त्यामुळे धान खरेदी सुरु केव्हा होणार असा प्रश्न आहे.दुसरीकडे दिवाळी अगदी अवघ्या पाच दिवसावर आली आहे. दिवाळी सण साजरा कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी १४०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करीत आहेत. प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत फिरुन शेतकऱ्यांचे धान खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

अपुऱ्या धान खरेदी केंद्राने होणार अडचणजिल्ह्यात आतापर्यंत २७ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. आणखी ३० ते ४० धान केंद्रांना खरेदीची परवानगी मिळणार आहे. मात्र, या अपुऱ्या धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २०७ धान खरेदी केंद्र होते.मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. 

सावकारांकडे धाव- हलक्या धानाचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे तर संपूर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले. एक क्विंटलही धान घरी येण्याची शक्यता नाही. अशा शेतकऱ्यांना आता सावकाराकडे जाऊन पैसे घ्यावे लागणार आहेत. दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेक जण सावकाराच्या दारात दिसत असून काही शेतकरी आपल्या पत्नीचे सौभाग्य लेणे मंगळसूत्र गहाण ठेवण्याच्या तयारीत आहेत. तर अनेक शेतकरी कुणाकडून उसणवार पैसे मिळतात काय याची चाचपणी करीत आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड