शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

भंडारा येथे कृषी दिनी केला शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी यांनी शेतकऱ्यांना बाजारातील बदलानुसार पिके घेऊन शेतकऱ्यांच्या संघटनांची असलेली आवश्यकता व शेतीतील बदलांविषयी मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव सांगितले. यावेळी सेंद्रीय शेती करणारे तानाजी गायधने यांनी आपल्या परिसरातील सेंद्रीय शेतीचे अनुभव कथन केले.

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती : जिल्हा परिषद आणि कृषी विभागाचे आयोजन, नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा परिषद भंडारा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमासाठी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी.जे. पाडवी, भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.निलेश वजीरे, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेषराव निखाडे, उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी यादवराव कापगते, वसंतराव नाईक शेतनिष्ठ पुरस्कार प्राप्त चंदूलाल राऊत, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त देवानंद चौधरी, प्रगतशिल शेतकरी संजय एकापुरे, चिखलीचे शेतकरी तानाजी गायधने यावेळी उपस्थित होते.यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी.जे. पाडवी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना पीक पद्धती बदलाविषयी मार्गदर्शन केले.भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी यांनी शेतकऱ्यांना बाजारातील बदलानुसार पिके घेऊन शेतकऱ्यांच्या संघटनांची असलेली आवश्यकता व शेतीतील बदलांविषयी मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव सांगितले.यावेळी सेंद्रीय शेती करणारे तानाजी गायधने यांनी आपल्या परिसरातील सेंद्रीय शेतीचे अनुभव कथन केले. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कारप्राप्त चंदूलाल राऊत यांनी मिळालेल्या पुरस्काराबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. कृषी दिनानिमीत्ताने निवडक शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये देवानंद चौधरी, चंदूलाल राऊत यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी विकास चौधरी यांनी केले. प्रास्ताविक पी.जे. पाडवी यांनी केले तर आभार पाडवी यांनी मानले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी