शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकऱ्याला मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

नेरी येथील गीरीधर मते यांनी आपल्या लाख रुपये खर्च करून शेतीत विंधन विहीर तयार केली. त्यानंतर त्याच्या मुलाने वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला. पण, विद्युत जोडणीकरिता प्रतीक्षा करावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. गरज असताना विद्युत जोडणी मिळाली नाही. म्हणजे ताटात वाढलेलं आहे पण खाता येत नाही.

ठळक मुद्देनेरी शेतशिवारातील प्रकार : मागणी करूनही जोडणी मिळेना

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी: शेतकऱ्यांच्या जवळ पाणी आहे मात्र विंधन विहीरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क तासांप्रमाणे शेतकयांला पैसे मोजावे लागत असल्याचाप्रकार नेरी येथे पाहण्यास मिळाला.आडात आहे पण पोहऱ्यांतून काढता येत नाही, अशी गंमत शेतकऱ्यांची झाली आहे. असाच वास्तविक अनुभव नेरी येथील शेतकºयांच्या बांधावर आला. शेती समृद्ध करण्यासाठी प्रथम सिंचनाची गरज असते. पण, सिंचनाची सोय तर केली जाते मात्र पाणी ओढण्यासाठी विजेची गरज असते. यात सगळं काही अडून बसते.नेरी येथील गीरीधर मते यांनी आपल्या लाख रुपये खर्च करून शेतीत विंधन विहीर तयार केली. त्यानंतर त्याच्या मुलाने वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला. पण, विद्युत जोडणीकरिता प्रतीक्षा करावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. गरज असताना विद्युत जोडणी मिळाली नाही. म्हणजे ताटात वाढलेलं आहे पण खाता येत नाही. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात रोपं वाचावीत यासाठी त्याची धडपड चालली होती. त्या शेतकºयांनी भाड्यानं डिझेल इंजिन आणला होता. नवीन प्लास्टिक पाईप घेवून आणला.दोनशे मीटर लांबीच्या अंतरावर भात रोपांना वाचविण्यासाठी त्या शेतकऱ्याची कसरत चालली होती. शेतात सिंचनाची सोय असूनही तीनशे रुपये प्रति तास सिंचन करण्याचे त्या शेतकऱ्याला भाडे द्यावे लागले. मार्च २०१९ पासून शेतावरील विंधन विहीर, विहिरीवर विद्युत जोडणी करण्यात आली नाही. त्यासाठी शासनाकडून निविदा काढण्यात आल्या नाहीत. आता पुन्हा काही दिवस प्रतीक्षा करा असं शेतकºयांना सांगण्यात आले आहे.दुपारी ते शेतकरी बांधावर भात रोपाला पैसे देवून सिंचन करीत होते. आज मात्र खूप दिवसानी पाऊस बरसला. तो सकाळी बरसला असता तर त्या शेतकऱ्याचे तीन ते चार हजार रुपये वाचले असते. खूप वजन असलेला डिझेल इंजिन शेतात नेण्यासाठी चार लोकांची मदत घ्यावी लागते. एका मालकाने चार चाकी गाडीत डिझेल इंजिन ठेवून तिथून जोडणी त्या विंधन विहीरला केली होती. त्यामुळे ते वजनदार साधन वहन करणे सोपे जात आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती