शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गाशेजारी देवसरा गावाच्या हद्दीत गट क्रमांक ३२२/२ मधील १ हेक्टर ८३ आर जागा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण ...

तुमसर-बपेरा राज्य मार्गाशेजारी देवसरा गावाच्या हद्दीत गट क्रमांक ३२२/२ मधील १ हेक्टर ८३ आर जागा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत २००६ मध्ये भूमिहीन लाभार्थी सदाशिव उंदिरवाडे यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने हस्तांतरित करण्यात आली. तत्पूर्वी जागेचे हस्तांतरण करताना भूमिअभिलेख विभागाच्या वतीने मोजमाप करण्यात आले होते. जागेचे हस्तांतरण झाल्यानंतर सदाशिव उंदिरवाडे यांनी धान पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली होती. नंतर एप्रिल २०१९ मध्ये वन विभागाच्या वतीने जागेचे मोजमाप करण्यात आले. सदाशिव उंदिरवाडे यांच्या हिश्श्यात असणारी ०.१५ जागा वन विभागाने ताब्यात घेतली आहे. ही जागा प्राप्त करण्यासाठी उंदिरवाडे यांनी संबंधित विभागात हेलपाटे घातले आहेत. वन, महसूल, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसमोर कैफियत मांडली आहे. प्रशासकीय विभागातील यंत्रणा न्याय देत नसल्याने उंदिरवाडे यांनी स्वतःच लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा १२ मार्च २०२० ला हस्तांतरित जागेचे मोजमाप भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने मोजमाप करण्यात आले आहे. ०.१५ आर जागा वन विभागाने बळकावल्याचे निदर्शनास आले आहे. जागेची मोजणी करताना बपेरा वन विभागात कार्यरत कर्मचारी हजर होते. सदाशिव उंदिरवाडे यांच्या हिश्श्यात जागा असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर हस्तांतरण करण्यात आले नाही. तब्बल वर्षभरानंतर न्याय मिळाला नाही.

यासंदर्भात तुमसरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. वन व भूमिअभिलेख कार्यलयाच्या संयुक्त सर्वेअरअंतर्गत जमिनीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु जागेचे मोजमाप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. यामुळे उंदिरवाडे यांचे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वन विभागाच्या विरोधात न्यायासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बॉक्स

समाजकल्याण विभागाचे कानावर हात

समाजकल्याण विभागांतर्गत सदाशिव उंदिरवाडे यांना जागेचे हस्तांतरण करताना विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही. मालगुजारी तलावात असणारी १ हेक्टर ८३ आर बुडीत जागा हस्तांतरित करण्यात आली. खरीप हंगामात या जागेत उत्पादन घेता येत नाही. शासनाने उदरनिर्वाहाकरिता जागा दिली असली तरी उंदिरवाडे कुटुंबियांचे टेन्शन वाढविणारे ठरले आहे. तलावात असणाऱ्या या शेतीत ३ फूट पाणी राहत असल्याने माती काम करण्यासाठी त्यांनी समाजकल्याण विभागाला पत्र दिले होते; परंतु कुणी ऐकले नाही. यामुळे इच्छामृत्यूची मागणी करणार आहेत.

जल आंदोलनानंतरही न्याय नाही

सदाशिव उंदिरवाडे, हंसा बागडे, डोंगरे यांनी बुडीत जमिनीत उत्पादन घेता येत नसल्याने समाजकल्याण विभागाने फसवणूक केल्याच्या कारणावरून जल आंदोलन तलावात केले होते. यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तहसील कार्यालयात तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या शेतकऱ्यांच्या शेतीत मातीकाम करण्यात येणार असल्याचे कटिबद्ध करण्यात आले होते; परंतु आंदोलन समाप्त होताच या शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्यात आला होता. आश्वासनाचे गाजर दाखवून वेळ मारून नेण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत.