शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन सुविधांअभावी शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकºयांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुका : बंधाऱ्यांचीही स्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्या असे शासन म्हणत असले तरीही आज तुमसर तालुक्यात अनेक गावात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय तलावांची निर्मीती केली. परंतु ४० वर्ष लोटूनही तलावांच्या नहराचे बांधकाम अर्धवट आहेत.तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे. पीक नष्ट होवून नुकसान सहन करावा लागतो. सन १९८० मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहेत. जवळील मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये प्रकल्पांचे नहर व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्य अजुनही अर्धवट पडलेले आहे. जे नहर बनले आहेत तेही आता दुरुस्तीला आले आहेत. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे.तुमसर तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारात प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावाचे पुनर्वसन झाले आहे. गावांचे पुनर्वसन झाले तरी अद्यापही गावकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या कायमच आहेत.कालव्यांच्या दुरुस्तीची गरजतालुक्यात मोठे सिंचन प्रकल्प असतांनाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. वर्षानुवर्षे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाने ग्रामीण भागातील शेतशिवारात असणारा कालवा दुस्तीची कामे त्वरित करण्याची गरज आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांतून ओरड होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती