शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सिंचन सुविधांअभावी शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकºयांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुका : बंधाऱ्यांचीही स्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्या असे शासन म्हणत असले तरीही आज तुमसर तालुक्यात अनेक गावात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय तलावांची निर्मीती केली. परंतु ४० वर्ष लोटूनही तलावांच्या नहराचे बांधकाम अर्धवट आहेत.तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे. पीक नष्ट होवून नुकसान सहन करावा लागतो. सन १९८० मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहेत. जवळील मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये प्रकल्पांचे नहर व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्य अजुनही अर्धवट पडलेले आहे. जे नहर बनले आहेत तेही आता दुरुस्तीला आले आहेत. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे.तुमसर तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारात प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावाचे पुनर्वसन झाले आहे. गावांचे पुनर्वसन झाले तरी अद्यापही गावकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या कायमच आहेत.कालव्यांच्या दुरुस्तीची गरजतालुक्यात मोठे सिंचन प्रकल्प असतांनाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. वर्षानुवर्षे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाने ग्रामीण भागातील शेतशिवारात असणारा कालवा दुस्तीची कामे त्वरित करण्याची गरज आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांतून ओरड होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती