शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

सिंचन सुविधांअभावी शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकºयांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुका : बंधाऱ्यांचीही स्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्या असे शासन म्हणत असले तरीही आज तुमसर तालुक्यात अनेक गावात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय तलावांची निर्मीती केली. परंतु ४० वर्ष लोटूनही तलावांच्या नहराचे बांधकाम अर्धवट आहेत.तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे. पीक नष्ट होवून नुकसान सहन करावा लागतो. सन १९८० मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहेत. जवळील मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये प्रकल्पांचे नहर व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्य अजुनही अर्धवट पडलेले आहे. जे नहर बनले आहेत तेही आता दुरुस्तीला आले आहेत. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे.तुमसर तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारात प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावाचे पुनर्वसन झाले आहे. गावांचे पुनर्वसन झाले तरी अद्यापही गावकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या कायमच आहेत.कालव्यांच्या दुरुस्तीची गरजतालुक्यात मोठे सिंचन प्रकल्प असतांनाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. वर्षानुवर्षे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाने ग्रामीण भागातील शेतशिवारात असणारा कालवा दुस्तीची कामे त्वरित करण्याची गरज आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांतून ओरड होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती