शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

धान उत्पादक शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: May 6, 2017 00:23 IST

मे महिन्यापासून उन्हाळी धानपिकांची खरेदी-विक्री सुरू होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र आहेत.

केंद्रांना खरेदीचे आदेश नाही : जिल्हा मार्केटिंगची चुप्पी, जिल्हाभरातील प्रश्न ऐरणीवरमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मे महिन्यापासून उन्हाळी धानपिकांची खरेदी-विक्री सुरू होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र आहेत. मात्र, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धन खरेदी केंद्राला अद्याप धान खरेदी करण्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची धन विक्रीसाठी फरफट होत आहे. परिणामी खासगजी शेतकऱ्यांकडे कवडीमोल दरात धान विकावे लागत आहे. धान पिकविणे जेवढे कठीण आहे. त्यापेक्षा त्यांची जोपासना करून विकणे कठीण झाले आहे. हमी धान केंद्र शासनाचे असले तरी केंद्र चालकांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अद्याप धान खरेदी करण्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी धान विक्रीसाठी पायपीट करून खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत असल्याचे वास्तव एकट्या पालांदूर परिसरातील नसून जिल्हाभरात बघायला मिळत आहे. उन्हाळी धान कापणीच्या हंगामाचा श्रीगणेशा होत आहे. तर अनेक ठिकाणी धानपिक कापण्यात आलेले आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे कापणी व मळणीचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यानंतर धान विक्रीला बाजारात उपलब्ध होतील. मात्र, नेहमीप्रमाणेच अनेक अडचणींचा सामना करीत धान कुठे ठेवायचे, अवकाळी पावसाच्या भितीने आच्छादन कसे करावे, मागणी किती दिवसांनी होईल, हमाल मोजणी व्यवस्थित करतील का, हमालीचा दर किती असेल, धान चोरीला जातील काय, मोजणीत इलेक्ट्रीक काटा असेल काय, मोजणीवेळी प्रतीकट्टा किती किलो धान अधिक नेतील, मोजणीनंतर मोबदला किती दिवसात मिळेल, बोनस मिळेल काय? अशा एक ना अनेक समस्यांनी धान उत्पादक शेतकरी विवंचनेत सापडला आहे.धान खरेदी केंद्रावर हमालांची उर्मटगीरी बंद का होत नाही. त्यांच्या मर्जीनेच केंद्र चालविल्या जाते. ‘बळीराजा’ म्हणून मिरविणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेत किंवा खरेदी केंद्रावर सन्मानाची वागणूक मिळत नाही, ही शोकांतिका आहे. केंद्रात धान पोहचल्यानंतर केंद्राने सुरक्षेची व मोजणीची जबाबदारी का स्वीकारू नये, रोहिणी, मृगाचा पाऊस येणारच मग धान ओले होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी केंद्राने का स्विकारू नये. कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री यांनी शेतकऱ्यांप्रती सहानुभूती का दाखवू नये, रात्रीला केंद्रावरून होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्याकरिता चौकीदाराची नियुक्ती का नाही, शेतकऱ्याला व त्याच्या गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय का नाही. प्रति कट्टा तीन ते चार किलोची नासधुस केली जाते. त्याला आळा का घालत नाही यासारख्या प्रश्नांनी धान खरेदी केंद्र रखडली आहे. जिल्हा मार्केटिंग व खरेदी विक्री किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती कर्तव्यापासून दोन हात लांब का जाते, अशी कुजबुज शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. शेतकरी काबाळकष्ट करून शेतीत धानपिकांसह अन्य उत्पादन घेतात. मात्र, शासनाकडून योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बोळवण होत आहे. शासनाने ती थांबविणे गरजेचे आहे.-डमदेव कहालकर, शेतकरी, खराशी.सहकारी संस्थेकडे धान खरेदी केंद्र आहे. परंतु जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत उन्हाळी धान खरेदी करण्यास विलंब होत आहे.- सुनील कापसे, गटसचिव, सेवा सहकारी संस्था, पालांदूर