शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पडल्या भेगा, बळीराजा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देढग जमतात पण पाऊस बरसत नाही : नेरला उपसा सिंचन ठरणार पर्याय, पाणी सोडण्याची गरज

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.एकट्या अड्याळ आणि परिसरात पाण्याअभावी अजूनही रोवणी खोळंबलेली आहे. कुठे रोवणी करायला पाणी नाही तर कुठे भातरोप जगविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.ज्यांच्या शेतात रोवणी झाली त्या जमिनीत भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून विशेषत: सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात पण बरसत नाही अशी स्थिती आहे. दुसरीकडे उन्ह - सावलीच्या खेळात उकाड्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.नेरला उपसा सिंचन योजनेंतर्गत अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी नियोजन करीत असले तरी आताही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकारी अभियंता अनिल परखडे, सहाय्यक उपविभागीय अभियंता अमोल वैद्य, अजय कावळे, प्रशांत येळणे, सुनील भुरे व त्यांची चमू या कामात व्यस्त दिसून येत आहे.उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले असले तरी काही शेतकरी इंजीनद्वारे पऱ्ह्यांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.कोरोना संकटात पाऊसही झाला लॉकडाऊनखापा : जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जात असला तरी बहुतांश शेतकऱ्याची मदार नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे. खापासह अन्य परिसरात गत आठवड्याभरापासून पाऊस न बरसल्याने वरुण राजाही लॉकडाऊन झाला काय अशी चर्चा आहे. दरम्यान बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला प्रारंभ केला होता. पेरणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पऱ्हेही आले. मात्र त्या दरम्यान अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्यामुळे या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले होते.अवकाळी संकटाचा सामना करीत असताना पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरविली आहे. दहा दिवसांपासून पाऊस न बरसल्याने पिके करपू लागली आहेत. पऱ्हे तांबूस व पिवळे दिसू लागले आहेत. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची पुन्हा एकदा गरज झाली आहे. नाहीतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी आर्थिक टंचाईलाही त्यांना सामोरे जावे लागेल.दमदार पावसाची प्रतीक्षारोवणीनंतर पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसावा अशी शेतकऱ्यांची उमेद होती. मात्र आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही पाऊस बरसलेला नाही. एकट्या उपसा सिंचनच्या भरवशावर किती दिवस धान पीक टिकवून ठेवायचे असा विचारही बळीराजा करीत आहेत. परिसरातील शेतकºयांना पुन्हा एकदा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस