शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कंत्राटदारच करताहेत उमेदवारांचा खर्च

By admin | Updated: July 22, 2015 01:15 IST

ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : पदाधिकाऱ्यांचा छुप्या बैठकांवर भरकरडी (पालोरा) : ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे. पंचायत राज पद्धतीमुळे ग्रामपंचायतीचे वजन वाढले तशा सर्वांच्या नजरा ग्रामपंचायत सत्ताकारणाकडे वळल्या. कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी पैसा ओतण्यास सुरूवात केली. करडी परिसरातील अनेक उमेदवारांना अशाच कंत्राटदारांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांचा संपूर्ण खर्च या कंत्राटदारांकडून होत आहे. नवनियुक्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा छुप्या बैठकांना प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांतूनच राजकाराचा पाया रचला जातो. त्यामुळेच या निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसतसे ग्रामीण वातावरण ठवळून निघत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लढणारे, जिंकणारे व हरणारे पुढारी सुद्धा यात सामील झाले आहेत. हरणारे बदला घेण्याची भाषा वापरित असले तरी विजयी मात्र जनाधार वाढवून ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.करडी परिसरातील देव्हाडा, जांभोरा, खडकी, पांजरा बोरी, केसलवाडा आदी गावात ग्रामपंचायत निवडणुका रंगत आहेत. मागील पाच वर्षात एकदाही नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी न भटकणारे पदाधिकारी मतदारांच्या घरी घिरट्या घालत आहे. पुन्हा एकदा संधी द्या, तुमच्या सर्व तक्रारी व अडचणी सोडविण्याची ग्वाही देण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या घरी राजकारण व राजकीय पद असावे म्हणून काहींनी सेटींग चालविली आहे. काटाकाटीचे, पाडापाडीच्या व्यूहरचना केल्या जात आहेत.राजकारण झाला व्यवसायवारंवार खोटे आश्वासने देणारी मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असून एका संधीची भीक मतदारांकडे मागत आहेत. विकास कामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी राजकारणालाच व्यवसाय केले आहे. पुढील पिढ्यांची सोय आताच झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या योजना राबविल्या जातात. कामांचे कंत्राटही दिले जातात. यासंबंधातूनच राजकीय मंडळीचे नातेवाईक, स्वकीय, पैसा खर्चून कामे मिळविणारे कंत्राटदार गर्भ श्रीमंत झाले आहेत. १० वर्षापूर्वी सायकलही घरी नव्हती ते चारचाकीने फिरताहेत. सोने-चांदी-दागदागिने, शेतीवाडी, घरेदारे आदी सुखवस्तूंची रेलचेल आहे. अल्पावधीत राजकारणाच्या पाठीवर उभे राहून मोठे झालेले कंत्राटदारच आज निवडणुकांत उमेदवार व मतदारांवर करावयाचा खर्च करताहेत. मर्जीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी, नावडत्यांना पाडण्यासाठी ताकत खर्ची घालत आहेत. कंत्राटदारांच्या राजकीय चुकीमुळेच अनेक गावातील कामे निकृष्ट दर्जाची, अर्धवट व कामात गैरप्रकार झाल्याचे घबाड उघडकीस येत आहेत. (वार्ताहर)