शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारच करताहेत उमेदवारांचा खर्च

By admin | Updated: July 22, 2015 01:15 IST

ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : पदाधिकाऱ्यांचा छुप्या बैठकांवर भरकरडी (पालोरा) : ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे. पंचायत राज पद्धतीमुळे ग्रामपंचायतीचे वजन वाढले तशा सर्वांच्या नजरा ग्रामपंचायत सत्ताकारणाकडे वळल्या. कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी पैसा ओतण्यास सुरूवात केली. करडी परिसरातील अनेक उमेदवारांना अशाच कंत्राटदारांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांचा संपूर्ण खर्च या कंत्राटदारांकडून होत आहे. नवनियुक्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा छुप्या बैठकांना प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांतूनच राजकाराचा पाया रचला जातो. त्यामुळेच या निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसतसे ग्रामीण वातावरण ठवळून निघत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लढणारे, जिंकणारे व हरणारे पुढारी सुद्धा यात सामील झाले आहेत. हरणारे बदला घेण्याची भाषा वापरित असले तरी विजयी मात्र जनाधार वाढवून ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.करडी परिसरातील देव्हाडा, जांभोरा, खडकी, पांजरा बोरी, केसलवाडा आदी गावात ग्रामपंचायत निवडणुका रंगत आहेत. मागील पाच वर्षात एकदाही नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी न भटकणारे पदाधिकारी मतदारांच्या घरी घिरट्या घालत आहे. पुन्हा एकदा संधी द्या, तुमच्या सर्व तक्रारी व अडचणी सोडविण्याची ग्वाही देण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या घरी राजकारण व राजकीय पद असावे म्हणून काहींनी सेटींग चालविली आहे. काटाकाटीचे, पाडापाडीच्या व्यूहरचना केल्या जात आहेत.राजकारण झाला व्यवसायवारंवार खोटे आश्वासने देणारी मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असून एका संधीची भीक मतदारांकडे मागत आहेत. विकास कामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी राजकारणालाच व्यवसाय केले आहे. पुढील पिढ्यांची सोय आताच झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या योजना राबविल्या जातात. कामांचे कंत्राटही दिले जातात. यासंबंधातूनच राजकीय मंडळीचे नातेवाईक, स्वकीय, पैसा खर्चून कामे मिळविणारे कंत्राटदार गर्भ श्रीमंत झाले आहेत. १० वर्षापूर्वी सायकलही घरी नव्हती ते चारचाकीने फिरताहेत. सोने-चांदी-दागदागिने, शेतीवाडी, घरेदारे आदी सुखवस्तूंची रेलचेल आहे. अल्पावधीत राजकारणाच्या पाठीवर उभे राहून मोठे झालेले कंत्राटदारच आज निवडणुकांत उमेदवार व मतदारांवर करावयाचा खर्च करताहेत. मर्जीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी, नावडत्यांना पाडण्यासाठी ताकत खर्ची घालत आहेत. कंत्राटदारांच्या राजकीय चुकीमुळेच अनेक गावातील कामे निकृष्ट दर्जाची, अर्धवट व कामात गैरप्रकार झाल्याचे घबाड उघडकीस येत आहेत. (वार्ताहर)