शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा वेळापत्रक व निकाल एसएमएसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST

निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नाही. अशा विद्यार्थ्यांना या एसएमएस सेवेचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक आणि निकालाची माहिती आता एसएसएमद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या संदर्भात सिनेटच्या सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याचा फायदा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे हिवाळी सत्रात एक हजार तर उन्हाळी सत्रात १२५० परीक्षांचे आयोजन करीत असते. सत्रांत परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना दोन ते तीन परीक्षांचा सामना करावा लागतो. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे या परीक्षेसंदर्भातील माहिती मोबाईल, एसएमएसद्वारे द्यावी असा ठराव सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी विद्यापीठाच्या बैठकीत मांडला. त्याला सभागृहातील सर्व सदस्यांनी समर्थन देत मंजुरी दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरच परीक्षेचे वेळापत्रक व निकालाची माहितीही मिळणार आहे.निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नाही. अशा विद्यार्थ्यांना या एसएमएस सेवेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे निकालाची सूचना न मिळाल्याने परीक्षेचा अर्ज भरताना अनेकदा भुर्दंड अनेकांना सोसावा लागतो. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त विलंब झाल्यास १५०० ते १४००० रुपयापर्यंत विलंब शुल्क भरण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर येते. त्यामुळे विद्यापीठाच्या उत्पन्नात भर पडत असली तरी विद्यार्थ्यांना मात्र त्याचा मोठा फटका बसतो. आता ही आर्थिक लूटही थांबणार असल्याचे प्रवीण उदापुरे यांनी सांगितले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठात मोठे बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांसाठी एसएमएसची सुविधा उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. उत्तरपत्रिका वेबसाईटवर उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.-प्रवीण उदापुरे,सिनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ

टॅग्स :Studentविद्यार्थी