शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

परीक्षा वेळापत्रक व निकाल एसएमएसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST

निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नाही. अशा विद्यार्थ्यांना या एसएमएस सेवेचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक आणि निकालाची माहिती आता एसएसएमद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या संदर्भात सिनेटच्या सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याचा फायदा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे हिवाळी सत्रात एक हजार तर उन्हाळी सत्रात १२५० परीक्षांचे आयोजन करीत असते. सत्रांत परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना दोन ते तीन परीक्षांचा सामना करावा लागतो. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे या परीक्षेसंदर्भातील माहिती मोबाईल, एसएमएसद्वारे द्यावी असा ठराव सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी विद्यापीठाच्या बैठकीत मांडला. त्याला सभागृहातील सर्व सदस्यांनी समर्थन देत मंजुरी दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरच परीक्षेचे वेळापत्रक व निकालाची माहितीही मिळणार आहे.निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नाही. अशा विद्यार्थ्यांना या एसएमएस सेवेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे निकालाची सूचना न मिळाल्याने परीक्षेचा अर्ज भरताना अनेकदा भुर्दंड अनेकांना सोसावा लागतो. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त विलंब झाल्यास १५०० ते १४००० रुपयापर्यंत विलंब शुल्क भरण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर येते. त्यामुळे विद्यापीठाच्या उत्पन्नात भर पडत असली तरी विद्यार्थ्यांना मात्र त्याचा मोठा फटका बसतो. आता ही आर्थिक लूटही थांबणार असल्याचे प्रवीण उदापुरे यांनी सांगितले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठात मोठे बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांसाठी एसएमएसची सुविधा उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. उत्तरपत्रिका वेबसाईटवर उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.-प्रवीण उदापुरे,सिनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ

टॅग्स :Studentविद्यार्थी