शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देश हादरवणारी घटना महिनाभरातच विस्मृतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्निकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून ...

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्निकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेतील दोघींना निश्चितच शिक्षा होईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु आता घटनेला जवळपास महिना होत आला तरी अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर संपूर्ण सरकारच जणू भंडाऱ्यात दाखल झाले होते. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही, तर उच्चस्तरीय चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टर, परिचारिकांवर कारवाई करण्यात आली.

मात्र या घटनेकडे कुणीच गांभीर्याने बघितले नाही, असे दिसून येते. विरोधी पक्षातील लोकांना काही मागण्या केल्या; परंतु त्याचाही फारसा प्रभाव पडला, असे आता म्हणता येत नाही. ज्या कुटुंबातील दहा बालकांचा या अग्निकांडात बळी गेला त्यांचे सांत्वन करण्यात आले. तातडीने आर्थिक मदतही करण्यात आली. मात्र या घटनेला असलेले मूळ कारण अद्यापही पुढे आले नाही. न्यायवैद्यक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या अहवालात काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार, असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु आता तो विषयही जणू विस्मृतीत गेल्याचे दिसून येते.

कुणावर कारवाई झाल्याने गेलेले दहा जीव परत येणार नाहीत. परंतु भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी दोषींना शिक्षा होणे गरजेचे असते. परंतु येथे निर्ढावलेली आरोग्य यंत्रणा कुणाच्यातरी दबावात वावरत असल्याचे दिसत आहे. भंडारा ठाण्यात केवळ या दहा बालकांच्या मृत्यूची आकस्मिक म्हणून नोंद करण्यात आली. दहा जीवांना न्याय देण्यासाठी कोणी तरी गांभीर्याने या विषयावर रस्त्यावर उतरायला हवे, परंतु आता महिनाभरानंतर या घटनेतील गांभीर्य संपले की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

बॉक्स

जिल्हा रुग्णालय सुधारता सुधरेणा

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडानंतर येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट होईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीच्या आठ-दहा दिवसांत ही यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसतही होती. परंतु आता पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना येथे मनस्ताप सहन करावा लागतो. वेळेवर कुणीही भेटत नाही. अनेकदा तर रुग्णांच्याच नातेवाइकांना स्टेचर ओढर रुग्णाला वॉर्डात न्यावे लागते. पट्टीबंधन कक्षातही अशीच अवस्था आहे. एका रुग्णाला तर स्वत:च ड्रेसिंग करण्याचा सल्ला देण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.