लिलाव होऊनही रेतीघाट बंद
By Admin | Updated: June 7, 2014 23:46 IST2014-06-07T23:46:43+5:302014-06-07T23:46:43+5:30
उन्हाळा सुरू होताच शासन स्तरावर रेतीघाट लिलाव प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील पाच रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण झाले असताना पावसाळा तोंडावर आला मात्र उत्खननाची परवानगी मिळाली नाही.

लिलाव होऊनही रेतीघाट बंद
लाखांदूर रेतीघाट : ‘ते’ रेतीघाट पावसाळ्यात सुरू होणार का?
लाखांदूर : उन्हाळा सुरू होताच शासन स्तरावर रेतीघाट लिलाव प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील पाच रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण झाले असताना पावसाळा तोंडावर आला मात्र उत्खननाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कामे रेंगाळली असून पावसाळ्यात रेतीघाट सुरू होणार का असा प्रश्न कंत्राटदारांनी उपस्थित केली आहे.
तालुक्यात वैनगंगा व चुलबंद नदीमुळे गौण खनिजाचे अमाप साठे आहेत. यात मुख्यत्वे शेतीला जिल्ह्याबाहेर मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. शासकीय नियमाप्रमाणे उन्हाळ्याची सुरवात होताच. वर्तमान पत्रात जाहिरात प्रकाशित करून लिलाव प्रक्रिया जलदगतीने पार पडली. यात तालुक्यातील दिघोरी, आथली, बोथली, आसोला, इटान रेतीघाट लिलाव प्रक्रियेत पूर्ण करून अनामत रक्कमसुद्धा शासकीय खजिन्यात भरण्यात आली. आज ना उद्या रेती उपसा करण्यासाठी परवानगी मिळेल म्हणून कंत्राटदार चातकासारखे वाट पाहत होते. परंतु, पावसाळा जवळ आला असताना उत्खननाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे एकूणच शासनाने व प्रशासनाने फसवणूक केल्याचे बोलले जाते. तालुक्यात अनेक विकास कामे मंजूर झाली. यासाठी रेतीची मागणी मोठय़ा प्रमाणात त्यामुळे नाईलाजास्तव कंत्राटदारांना चोरीचा मार्ग अवलंबवावा लागला. एकूणच चोरी करण्यासाठी प्रशासनानेच प्रवृत्त केल्याचाही आरोप कंत्राटदारांनी केला. रेतीची चोरी झाली नसती तर तालुक्यातील विकास कामे खुटले असते. शासकीय योजना निष्फळ ठरल्या असत्या. यावेळी महसूल विभागाने अधिकाराचा वापर करून रेती चोरीचे ट्रॅक्टरवर थातूरमातूर कार्यवाही करून मार्ग मोकडा केला. यावर्षी तालुक्यातील रेतीघाटातील रेती उपसा करण्यासाठी परवानगी न दिल्याने मात्र, रेतीची चोरी झाल्याने शासकीय तिजोरीला चुना लागला. प्रशासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करीत आहेत.
अवैध रेती उपसा करणार्यांवर महसूल विभागाने दंडात्मक कार्यवाहीतून लाखोचा महसूल जमा केला.
जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने रेतीघाट सुरू करण्याचे सौजन्य न दाखविता तलाठी मंडळ अधिकारी, पोलीस यांच्या चमू तयार करून रात्रीला गस्त लावून अवैध रेती उपसा करणार्यांवर कार्यवाही करण्यासाठी कंबर कसली. परंतु ही मोहीमसुद्धा निष्प्रभ ठरली. आजही तालुक्यात रेती उपसा होतच आहे. दंडात्मक रक्कम भरणे सुरूच आहे. रेती उपसा करण्यासाठी प्रशासन व अधिकार्यांकडून का प्रयत्न केले जात नाही. पाणी कुठे मुरत आहे हे समजण्यास मार्ग नाही. पावसाळा काही दिवसावर आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत पास झालेले रेतीघाट पावसाळ्यात सुरू होणार का, असा प्रतिप्रश्न कंत्राटदारांकडून विचारला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)