शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पर्यावरण संवर्धन: या गावात अंघोळीसाठी ग्रामपंचायत देते माेफत गरम पाणी, साेलर पॅनलचा प्रभावी वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:39 IST

Environmental Conservation: संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने आता वृक्षताेड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला.

- चंदन माेटघरेलाखनी (भंडारा) : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने आता वृक्षताेड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी ६ वाजल्यापासून गावकऱ्यांना माेफत गरम पाणी पुरविले जात आहे. आठवड्याभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गावातील १२० कुटुंब घेत असून संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाची चर्चा आहे.

लाखनी तालुक्यातील रेंगेपार ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. ग्रामपंचायतीला २०११ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे राज्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले हाेते. तसेच स्मारक ग्राम याेजनेचे बक्षीसही मिळाले आहे. लहान माेठे अनेक पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकाविले आहे. पर्यावरण संवर्धनसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १०० एकर परिसरात वृक्ष लागवड केली आहे.  थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठी अतिरिक्त सरपण लागते. त्यासाठी वृक्षतोड हाेऊ नये म्हणून आता ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. सरपंच मनाेहर बाेरकर यांच्या पुढाकाराने साेलर वाॅटर हिटर सयंत्र लावण्यात आले आहे. त्यासाठी दाेन लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक एच. व्ही. लंजे यांनी दिली. 

गावकऱ्यांना नळ याेजनेद्वारे मुबलक पाणी दिले जाते. गरम पाणी पुरविण्याची कल्पना त्यातूनच आली. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून साैर उर्जेद्वारे गरम पाणी गावकऱ्यांना दिले जाते. सकाळी अंघाेळ करून ग्रामस्थांनी आपल्या कामाला निघावे. हा यामागचा उद्देश आहे.    - मनाेहर बाेरकर, सरपंच रेंगेपार काेहळी

गावासाठी एकच सौर हीटर nदीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे आहे. साेलर पॅनलद्वारे पाणी गरम हाेते. सकाळी ६ वाजल्यापासून १२० कुटुंबाना गरम पाणी माेफत दिले जाते. यासाठी काेणताही माेबदला घेतला जात नाही. nगृहकर व पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे.रेंगेपार काेहळी गावाची लाेकसंख्या १८७९ असून १२० कुटुंब येथे राहतात. संपूर्ण गावकऱ्यांचा या उपक्रमात सहभाग आहे.

सकाळपासून गरम पाण्यासाठी गर्दीगरम पाणी तेही माेफत मिळत असल्याने सकाळपासूनच रेंगेपार येथील नागरिकांची गर्दी हाेते. ग्रामपंचायतीच्या परिसरात लावलेल्या या सयंत्रातून गरम पाणी नेण्यासाठी महिला पुरुष गर्दी करून असतात. सकाळी ६ ते १० असे चार तास गरम पाणी दिले जाते.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत