अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका
By Admin | Updated: January 6, 2015 22:56 IST2015-01-06T22:56:05+5:302015-01-06T22:56:05+5:30
बसस्टॉप चौक मोहाडी येथील अतिक्रमणाने रहदारीस कोणताही अडथळा नसल्याने तसेच बेरोजगारांचे परिवार पानटपरीवर अवलंबून असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवू नये किंवा

अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका
मोहाडी : बसस्टॉप चौक मोहाडी येथील अतिक्रमणाने रहदारीस कोणताही अडथळा नसल्याने तसेच बेरोजगारांचे परिवार पानटपरीवर अवलंबून असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवू नये किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या आशयाचे निवेदन फुटपाथ दुकानदार संघटनेतर्फे मोहाडीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना देण्यात आले.
मोहाडी येथील बसस्टॉप चौकात अनेक लोकांनी शासकीय जागेवर पानटपरी, मोटारसायकल दुरुस्ती, केस कर्तनालय, जोडे जप्पल दुरुस्ती यासारखे अनेक प्रकारचे दुकाने लावून परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र या सर्वांना तहसील कार्यालयातर्फे अतिक्रमण काढण्याचे नोटीस बजावण्यात आल्याने या अतिक्रमणधारकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. याच उद्योगधंद्यावर त्यांच्या परिवाराचे सर्वस्व अवलंबून आहे. या सर्व दुकानदारांनी आपली संघटना तयार करून दुकानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, राज्य मार्गाला लागून सीमा रेषा निश्चित करून द्यावी, जर आमचे अतिक्रमण हटविण्यात येत असेल तर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले अर्जनविसांचे अवैध बांधकाम सुद्धा पाडण्यात यावे, तहसील कार्यालयात आवार भिंत तयार करण्यात यावी व अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्याअगोदर अतिक्रमणधारकांसोबत चर्चा करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अनिल मांढरे, अजय गायधने, अशोक लुटे, भगवान पवनकर, हिरालाल नंदनवार, अनिल न्यायखोर, संजय नागमोते, सोनू मेहर, हसरत शेख, राजेश पराते, सलीम शेख, कल्याण बारापात्रे, आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)