शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

राष्ट्रीय पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST

शासनाने अंशदायी पेन्शन योजना बंद करून त्या ठिकाणी राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही दिवसापासून सक्ती ...

शासनाने अंशदायी पेन्शन योजना बंद करून त्या ठिकाणी राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही दिवसापासून सक्ती केली आहे. मात्र याला जुनी पेन्शन हक्क संघटनेने आपला विरोध दर्शवला असून आधी शासकीय कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आतापर्यंतच्या संपूर्ण कपातीचा हिशोब द्या आणि मगच नवीन योजना लागू करा अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, उपाध्यक्ष गोपाल मेश्राम, राज्य संपर्कप्रमुख सुधीर माकडे, कार्याध्यक्ष धोंडीराम हाके, कोषाध्यक्ष अमोल जांभुळे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद किंडरले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्यात २००५ नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून त्या ठिकाणी डीसीपीएस म्हणजेच अंशदायी पेन्शन योजना लागू केली होती. गेल्या १३ वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात करून तेवढाच शासन वाटा घालून ही रक्कम अंशदायी पेन्शन योजनेत गुंतवणूक करून त्यातून होणाऱ्या लाभातून शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर या पैशांचा लाभ देण्यात येणार होता. मात्र याचा शासनाने कुठेही लेखी हिशोब दिलेला नाही. यासोबतच सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला कोणतेही विमा कवच व सानुग्रह अनुदान अंशदायी पेन्शनमध्ये लाभ मिळाला नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी प्रशासनाला जुनी पेन्शन संघटनेने वारंवार लेखी निवेदने दिल्यानंतरही याचा अद्याप कुठेही हिशोब मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या पेन्शन योजनेला संपूर्ण राज्यभरातून विरोध केला जात आहे. राज्य शासनाकडे प्रत्येक जिल्ह्यातून आतापर्यंत कर्मचारी कपात शासन हिस्सा व आतापर्यंतचे एकूण व्याज असा संपूर्ण हिशोब मागूनही त्याचा कुठेही हिशोब दिलेला नाही. जिल्ह्यात २००५ नंतर सेवेतील काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असताना शासनाने कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. या मदतीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला आहे; मात्र वृद्ध कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान अथवा इतर कोणताही लाभ शासनाने दिलेला नाही. त्यामुळे अंशदायी पेन्शन योजनेला जुनी पेन्शन हक्क संघटनने विरोध कायम ठेवला आहे. प्रशासनाने अंशदायी पेन्शन योजनाऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना नव्या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. मात्र जोपर्यंत आम्हाला शासन हिशोब देत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, विमाकवच व सानुग्रह अनुदानाचे १० लाख रुपये अशी कोणतीच मदत शासनाने दिलेली नाही. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आज जीवन जगताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

शिक्षणसेवकांची जबाबदारी शासन घेणार काय?

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावासाठी नियमित शिक्षकांसोबतच शिक्षणसेवकांनाही कर्तव्य निभावावे लागत आहे. एकीकडे शासन शिक्षणसेवकांना अल्प मानधन तसेच शासनाच्या विविध लाभापासून वंचित ठेवत आहे. तीन वर्षाच्या काळात कोणताही हक्क मिळणार नसल्याचे सांगते तर दुसरीकडे कोरोनाकाळात कर्तव्य निभावत असताना जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची शासन जबाबदारी घेणार काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.

कोट

जिल्ह्यात २००५ नंतर नियुक्त काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असतानाही शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाचे १० लाख रुपये द्यावे. अंशदायी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणारी कपात व शासन हिस्सा या दोन्ही रकमेचा आजपर्यंतचा हिशोब कर्मचाऱ्यांना लेखी देण्याची आमची मागणी आहे.

संतोष मडावी, जुनी पेन्शन हक्क संघटना, जिल्हाध्यक्ष

कोट

प्रशासनाने अंशदायी पेन्शन योजना बंद करून त्याऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतीही सक्ती करू नये. यासोबतच शासनाकडे आधी कपात झालेल्या संपूर्ण रकमेचा हिशोब कर्मचाऱ्यांना द्यावा.

गोपाल मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटना.