शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जिल्ह्यात आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तीरावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.

ठळक मुद्देपावसाचा कहर : घर पडून दोघांचा, तर पुरात वाहून सहा जणांचा मृत्यू, वैनगंगा धोक्याच्या पातळीवरच, अनेक घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पावसाने कहर केला असून आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. सहा जणांचा मृत्यू नदीच्या पुरात वाहून गेल्याने तर दोघांचा मृत्यू घर कोसळल्याने झाला. गत आठवडाभरापासून दररोज पाऊस कोसळत असून वैनगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. या अतिवृष्टीने शेती पिकांसोबतच अनेक घरांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तीरावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील डेव्हिड गोपाल सोनटक्के (८) हा शनिवारला ७ सप्टेंबर रोजी गावानजीकच्या नाल्यात बुडाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच हाती आला. सूरनदीला आलेल्या पुरात शेतकरी केशव जागो मेश्राम रा. खमारी बुज. हा वाहून गेला. त्याचा दुसºया दिवशी मृतदेह हाती आला. तर चांदोरी-शिंगोरी नाल्याच्या पुरात जनावरांचे पिकअप वाहन वाहून गेले. सहा जनावरे मृत्युमुखी पडली. सुदैवाने चालक बचावला. तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी सकाळी शेजारी घराचे भींत कोसळून निलकराम ईसाराम शेंडे (५४) हा ठार झाला तर त्याची मुलगी कुंदा नेवारे (२४) आणि निर्मला वगारे (५०) या गंभीर जखमी झाल्या.मंगळवारी पूर पाहण्यासाठी गेलेले साकोली तालुक्यातील सराटी येथील दोन तरूण वाहून गेले. निखिल केशव खांडेकर (१७), हितांशू प्रमोद खोब्रागडे (१९) अशी या तरूणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह नदीपात्रात आढळून आले. तर पवनी तालुक्यातील मौदी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची अद्यापही ओळख पटली नाही. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील बबन जयराम कांबडी (६०) यांचा मृतदेह शेताच्या बांधीतील पाण्यात आढळून आला. यासोबतच लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे घराची भिंत कोसळून अजय केशव हेमणे (३०) आणि अनिल केशव हेमणे हे दोघे भाऊ जखमी झाले. भंडारा तालुक्यातील परसोडी येथे भींत कोसळल्याने सविता सुर्यभान थेरे (५५) ही महिला जखमी झाली. साकोली तालुक्यातील उसगाव पुलावरून कार पुरात वाहून गेली होती. सुदैवाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.सततच्या पावसाने जिल्ह्यातील पन्नासावर घरांची पडझड झाली असून शेतशिवारात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान होत आहे.कारधा येथे वैनगंगेचा जलस्तर ९.३० मीटरमध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात झालेल्या अतिवृष्टीने आणि प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने भंडारा येथून वाहनारी वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. धोक्याची पातळी ९.५ मीटर असून शुक्रवारी दुपारी २ वाजता ९.३० मीटर जलपातळी मोजण्यात आली. कालीसराट प्रकल्पाचे चार दरवाजे एक फूट आणि पुजारीटोला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. तर धापेवाडा प्रकल्पाचे २३ दरवाजे ५.५. मीटरने उघडले आहे. यातून एक लाख २३ हजार ६०२.५० क्युसेक पाण्याचा विसर्ज सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वैनगंगेची जलपातळी वाढली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे १७ दरवाजे एक मीटरने आणि १६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून एक लाख ९२ हजार ८१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.कारली येथे घर कोसळून वृद्ध ठारतुमसर : तालुक्यातील कारली येथील मातीचे घर कोसळल्याने वृद्ध ठार झाला. ही घटना शुक्रवारच्या पहाटे घडली. दशरथ पुना नागपुरे (७५) असे मृताचे नाव आहे. तो आपल्या घरी झोपला होता. पावसाने घराची भींत कोसळली. त्यात त्याचा दबून मृत्यू झाला. सुदैवाने या कुटुंबातील अन्य दहा जण थोडक्यात बचावले. दशरथ नागपूरे यांच्या कुटुंबात तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुदैवाने ही मंडळी बचावली. आता घर पडल्याने या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी दशरथ नागपुरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात हळहळ व्यक्त होत आहे.विसर्जनाला गेलेला तरूण बेपत्तागणपती विसर्जनासाठी गेलेला तरूण नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या ढोलसर येथे घडली. सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी तो गावातील नागरिकांसोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. मूर्ती पाण्यात विसर्जित करताना त्याचा तोल गेला आणि प्रवाहासोबत वाहून गेला. अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नाही. तहसीलदारांच्या मार्गदर्शनात बचाव पथकाद्वारे शोध जारी करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर